AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : गरजेच्या वेळी काढता येणार पैसा, वारंवार दावा फेटाळण्याची नको चिंता, ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना देणार फायदा

EPFO : कर्मचाऱ्यांना ईपीएफओने मोठा दिलासा दिला आहे..

EPFO : गरजेच्या वेळी काढता येणार पैसा, वारंवार दावा फेटाळण्याची नको चिंता, ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना देणार फायदा
दाव्याची चिंता नकोImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 08, 2022 | 8:41 PM
Share

नवी दिल्ली : जरी तुमचा EPF दावा वारंवार नामंजूर होत असेल तर आता त्यासाठी जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण निकडीच्यावेळी तुम्हाला आता रक्कम काढता येणार आहे. भविष्य निर्वाह कर्मचारी संघटनेने (EPFO) याविषयी देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांना पत्र पाठवलं आहे. त्यांनी पत्रात दावे (Claim) निकाली काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्याचे टाळण्यात येईल. तसेच दावा का फेटाळण्यात येत आहे, याची सुस्पष्ट कारण सदस्याला द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता कार्यालयांवर दबाव आला आहे.

EPFO ने सर्वात अगोदर प्रत्येक दावा तपासण्याचे, बारकाईने त्याची गरज लक्षात घेण्याचे निर्देश दिले आहेत. एकाच कारणासाठी वारंवार दावे फेटाळण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईपीएफओने याविषयी कडक भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांना निकडीच्यावेळी रक्कम मिळावी यासाठी निर्देश देण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांनी एकाच कारणासाठी किती क्लेम रिजेक्ट केले, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. महिन्याभराच्या डेटानुसार हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवायचा आहे. काही क्षेत्रीय कार्यालयात कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्यासाठी स्वतःचाचे नियम हाकत असल्याचे उघड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या चुकीच्या नियमावलीमुळे कर्मचाऱ्यांना गरजेच्यावेळी रक्कम मिळण्यात अडचण येत होती. कर्मचाऱ्यांनी याविषयी संघटनेकडे तक्रार केली. अशा तक्रारींची संख्या वाढल्यानंतर दावा फेटाळण्यासंबंधीचे नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे आता दावा फेटाळण्याची कारणे द्यावी लागणार आहेत.

आता छोट्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती योजना आणि विम्याचा लाभ मिळेल. कंपन्यांना यामध्ये त्यांचा वाटा देता येणार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, केंद्र सरकार त्यासाठी लवकरच नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे अगदी 10 कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कामगारांनाही लाभ मिळणार आहे.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.