AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : गरजेच्या वेळी काढता येणार पैसा, वारंवार दावा फेटाळण्याची नको चिंता, ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना देणार फायदा

EPFO : कर्मचाऱ्यांना ईपीएफओने मोठा दिलासा दिला आहे..

EPFO : गरजेच्या वेळी काढता येणार पैसा, वारंवार दावा फेटाळण्याची नको चिंता, ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना देणार फायदा
दाव्याची चिंता नकोImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 08, 2022 | 8:41 PM
Share

नवी दिल्ली : जरी तुमचा EPF दावा वारंवार नामंजूर होत असेल तर आता त्यासाठी जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण निकडीच्यावेळी तुम्हाला आता रक्कम काढता येणार आहे. भविष्य निर्वाह कर्मचारी संघटनेने (EPFO) याविषयी देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांना पत्र पाठवलं आहे. त्यांनी पत्रात दावे (Claim) निकाली काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्याचे टाळण्यात येईल. तसेच दावा का फेटाळण्यात येत आहे, याची सुस्पष्ट कारण सदस्याला द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता कार्यालयांवर दबाव आला आहे.

EPFO ने सर्वात अगोदर प्रत्येक दावा तपासण्याचे, बारकाईने त्याची गरज लक्षात घेण्याचे निर्देश दिले आहेत. एकाच कारणासाठी वारंवार दावे फेटाळण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईपीएफओने याविषयी कडक भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांना निकडीच्यावेळी रक्कम मिळावी यासाठी निर्देश देण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांनी एकाच कारणासाठी किती क्लेम रिजेक्ट केले, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. महिन्याभराच्या डेटानुसार हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवायचा आहे. काही क्षेत्रीय कार्यालयात कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्यासाठी स्वतःचाचे नियम हाकत असल्याचे उघड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या चुकीच्या नियमावलीमुळे कर्मचाऱ्यांना गरजेच्यावेळी रक्कम मिळण्यात अडचण येत होती. कर्मचाऱ्यांनी याविषयी संघटनेकडे तक्रार केली. अशा तक्रारींची संख्या वाढल्यानंतर दावा फेटाळण्यासंबंधीचे नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे आता दावा फेटाळण्याची कारणे द्यावी लागणार आहेत.

आता छोट्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती योजना आणि विम्याचा लाभ मिळेल. कंपन्यांना यामध्ये त्यांचा वाटा देता येणार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, केंद्र सरकार त्यासाठी लवकरच नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे अगदी 10 कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कामगारांनाही लाभ मिळणार आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.