AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारच्या निर्णयांमुळे विमा क्षेत्राला सुगीचे दिवस, कंपन्यांचे नशीब पालटणार?

पहिल्यांदाच भारतीय विमा कंपन्यांमधील मालकी हक्काइतका हिस्सा विकत घेण्याचा परदेशी कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. | Insurance sector

मोदी सरकारच्या निर्णयांमुळे विमा क्षेत्राला सुगीचे दिवस, कंपन्यांचे नशीब पालटणार?
Insurance
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 09, 2021 | 9:03 PM
Share

नवी दिल्ली: विमा क्षेत्रात 74 टक्के परकीय गुंतवणुकीला (FDI) मान्यता देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे परकीय गुंतवणुकदार या क्षेत्रात आणखी रस घेतील. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमा कंपन्याही भारतामध्ये प्रवेश करतील. यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढून ग्राहकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. (Major changes will happen in Insurance sector in future)

मोदी सरकारच्या निर्णयामुळे काय बदल होणार?

केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढली. परिणामी पहिल्यांदाच भारतीय विमा कंपन्यांमधील मालकी हक्काइतका हिस्सा विकत घेण्याचा परदेशी कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, हा निर्णय घेताना केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना काही अटही घातली आहे. या विमा कंपन्यांचे प्रमुख व्यवस्थापन कर्मचारी आणि संचालक मंडळाचे सदस्य निवासी भारतीय हवेत. तसेच संचालक मंडळात स्वतंत्र निर्देशकांचा समावेश असावा.

परकीय गुंतवणुकीला चालना मिळणार

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विमा क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर परकीय गुंतवणूक येऊन या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. त्यासाठी केंद्र सरकारकडून विदेशी मालकीच्या नियमातही सूट दिली जाऊ शकते. बाजारपेठेत परकीय भांडवल आल्यामुळे वितरकांचे जाळे विस्तारण्यास आणि डिजिटलीकरणाच्या प्रक्रियेला आणखी वेग येईल.

तसेच मार्केटिंग आणि ग्राहक सेवा क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यासाठी नव्या भांडवलाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात विमा क्षेत्राचा विकास झपाट्याने होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

लॉकडाऊन काळात टाईमपास म्हणून प्रयोग केला, आता घरीबसल्या बक्कळ कमाई!

क्रिप्टोकरन्सी बिल अंतिम टप्प्यात, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलं जाणार

खाजगीकरणाविरोधात बँकांचा दोन दिवस संप, मार्च महिन्यात संपाची घोषणा

(Major changes will happen in Insurance sector in future)

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद