AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR News : ITR भरण्याची वेळेपूर्वी करा घाई, संधीला तोड नाही , असे मिळवा सहा फायदे

Last Date ITR : आयकर विवरण पत्र वेळेत भरले तर दंड आणि कारवाईपासून तुम्ही वाचू तर शकतातच पण वेळेच्या आत आयटीआर भरल्यास हे सहा फायदे होतात.

ITR News : ITR भरण्याची वेळेपूर्वी करा घाई, संधीला तोड नाही , असे मिळवा सहा फायदे
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 10, 2022 | 6:07 PM
Share

आयकर विवरण पत्र भरण्यासाठी तुम्ही शेवटच्या तारखेची वाट पाहत आहात काय ? करदात्यांनी (Taxpayer) आयकर विवरण पत्र (Income Tax Return) वेळेच्या आत भरणे आवश्यक आहे. त्यामुळे कारवाई आणि दंड (Penalty) दोन्ही टाळता येते. आयकर विवरण पत्र (ITR) भरण्यासाठी बरेच करदाते चालढकल करतात. वेळेवर तांत्रिक अडचणी आल्या की, त्यांची तारांबळ उडते. महत्वाचे काम सोडून आयटीआर भरण्यासाठी धावाधाव करावी लागते. काही तांत्रिक बिघाडामुळे रिटर्न वेळेच्या आत भरता येत नाही. कालमर्यादा(Time Bond) संपल्यानंतर आयटीआर दाखल केल्यास, आयकर कायदा (Income Tax Act), 1961 च्या कलम 234A अंतर्गत व्याज तर लागतेच पण दंड ही आकारल्या जातो. त्यामुळे वेळेच्या आता आयकर विवरण पत्र भरले तर तुमच्यावरील कारवाई टळू शकेल आणि वेळेत आयटीआर न भरल्यामुळे होणारा नाहकचा मनस्ताप ही तुम्ही वाचवू शकाल. एवढेच नाही तर वेळेत आयकर विवरण पत्र दाखल केल्यास तुम्हाला फायदा ही होतो. चला तर बघुयात करदात्याला काय फायदा होऊ शकतो ते.

कर्ज मंजूरी लवकर

कर्ज मंजुरीसाठी आयटीआरची प्रत आवश्यक असते. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात अगोदर सर्व कामे सोडून आयटीआर भरणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्ज मंजूरीसाठी त्रास होणार नाही. आयटीआर प्रत जोडल्यास कर्ज मिळणे सोपे होते. गृहकर्ज असो वा वाहन कर्ज, सर्व बँका आयकर विवरण पत्राची प्रत मागतात.

व्हिजा

परदेशात जाण्याचा बेत आखात असाल तर आयटीआरची प्रत तुमच्या कामी येईल. कारण इमिग्रेशन (emigration) कार्यालयात अगोदर आयटीआरची प्रत तुमच्याकडून घेण्यात येते. आजच्या घडीला जवळपास सर्वच परराष्ट्र वकालती, दूतावास(Embassy) वाणिज्य दूतावास (consulate) तुम्ही सध्या भारलेल्या उत्पन्न कर विवरण पत्र मागतील. त्याशिवाय तुम्हाला व्हिजा(VISA) मिळणार नाही.

कर परताव्याचा दावा

टीडीएस मार्फत रक्कम कपात झाली आणि ती परत मिळवायची असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे आवश्यक आहे. उत्पन कर विवरण पत्र भरल्याशिवाय तुम्हाला परताव्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. तरच तुमच्या खात्यात टीडीएसची रक्कम जमा होईल.

उत्पन्न आणि पत्त्याचा सबळ पुरावा

उत्पन्न आणि पत्ता याचा सबळ पुरावा म्हणून आयटीआर उपयोगी पडतो. यापेक्षा दुसरे मजबूत कागदपत्र असू शकत नाही. तुमचे उत्पन्न आणि पत्त्यासाठी हा सबळ पुरावा म्हणून उपयोगी पडतो. कारण त्याला प्राप्तिकर खात्याची पुष्टी असते.

नुकसान भरपाई

31 जुलै पूर्वी तुम्ही आयटीआर जमा करत असाल तर तुम्हाला नुकसानीची भरपाई पुढील वर्षांपर्यंत वाढविता येईल. ही भरपाई तुम्हाला पुढच्या आर्थिक वर्षांपर्यंत वाढविता येते. या नुकसानीची भरपाई तुम्हाला पुढील वर्षी करता येते. एवढेच नाही तर पुढच्या वर्षी लवकर ही प्रक्रिया पूर्ण केल्यास या जबाबदारीतून ही तुम्हाला माफी मिळू शकते.

दंडाच्या रक्कमेतून दिलासा

आयटीआर वेळेच्या आत भरल्यास तुम्ही कारवाई आणि दंडातून तुमची सूटका तर होईलच पण मनस्तापातून ही दिलासा मिळेल. दंडावर तुम्हाला कधी कधी व्याज ही आकारल्या जाऊ शकते. दंडाची रक्कम 5,000 रुपयांपर्यंत असू शकते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.