Budget : पुढील बजेटमध्ये जनतेसाठी खास भेट, अर्थमंत्री म्हणाल्या हे बदल होतील थेट..

| Updated on: Oct 12, 2022 | 4:43 PM

Budget : पुढील बजेटसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी डिसेंबर महिन्यापासूनच अर्थसंकल्पाची तयारी सुरु करण्यात येणार आहे.

Budget : पुढील बजेटमध्ये जनतेसाठी खास भेट, अर्थमंत्री म्हणाल्या हे बदल होतील थेट..
सरकार बजेटमध्ये देणार ही भेट
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाची (Budget) चर्चा आतापासूनच रंगात आली आहे. कारण ही तसचं आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) आता जागतिक मंचावरच अर्थसंकल्पाची रुपरेषा कशी असेल याचा उलगडा केला आहे. पुढील बजेटसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी डिसेंबर (December) महिन्यापासूनच अर्थसंकल्पाची तयारी सुरु करण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत(Budget 2023) मोठी घोषणा केली आहे. पुढील अर्थसंकल्पासाठी आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे. मंदीचा परिणाम बघता केंद्र सरकारने विकास दर कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होईल.

केंद्रीय अर्थमंत्री सध्या अमेरिकेत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी त्या वॉशिंग्टन येथे पोहचल्या आहेत. अर्थतज्ज्ञ ईश्वर प्रसाद यांच्यासोबत सीतारमण यांनी अर्थसंकल्पाविषयी चर्चा केली.

हे सुद्धा वाचा

पुढील अर्थसंकल्पाविषयी सर्वच सांगणे अवघड असल्याचे स्पष्ट करत, अर्थमंत्र्यांनी या बजेटचा उद्देश काय असेल यावर प्रकाश टाकला. आर्थिक वृद्धीत सातत्य ठेवणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

महागाईच्या आघाडीवर सरकार उपाय योजना करणार आहे. महागाई कमी करणे आवश्यक असल्याचे सांगत सरकार त्यावर काम करत असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला आहे. सीतारमण यांनी महागाईवर चिंता दाखवत, ती कमी करण्यासाठी खास प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील अर्थसंकल्पासाठी डिसेंबर महिन्यातच तयारी करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये लोकसभेत बजेट सादर करण्यात येईल. विकासाची गती कायम ठेवण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विशेष योजनाही राबविण्यात येणार आहे.

कोरोना महामारीनंतर देशाची स्थिती अधिक मजबूत करणे, खाद्यपदार्थाच्या किंमती, अन्नधान्याच्या किंमती कमी करणे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.