AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटानंतर अदानींची एन्ट्री, महाराष्ट्रात 83 हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्लॅन्ट, इस्त्रायल कनेक्शनमुळे चीनची झोप उडाली

ratan tata gautam adani: सेमीकंडक्टर म्हणजेच सिलिकॉन चिप प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनात वापरली जातो. परंतु सेमीकंडक्टरची निर्मिती आतापर्यंत भारतात होत नव्हती. भारत सेमीकंडक्टर आयात करत होता. जगभरात या क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे.

टाटानंतर अदानींची एन्ट्री, महाराष्ट्रात 83 हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्लॅन्ट, इस्त्रायल कनेक्शनमुळे चीनची झोप उडाली
ratan tata gautam adani
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 08, 2024 | 12:02 PM
Share

भारताला सेमीकंडक्टर हब करण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली जात आहे. उद्योगपती रतन टाटा यांनी आसाममध्ये सेमीकंडक्टर प्लॅन्ट सुरु केला. त्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी टाटांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्लॅन्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला. अदानी समूहाकडून 83 हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात सुरु केला जाणार आहे. महाराष्ट्रातील या प्रकल्पासाठी अदानी समुहाला इस्त्रायलची मदत मिळणार आहे. यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात आतापर्यंत वर्चस्व असलेल्या चीनची झोप उडाली आहे.

भारत बनणार सेमीकंडक्टर हब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला मोबाइल हब बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोदी सरकारने सेमीकंडक्टर पीएलआय (प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह) स्कीम सुरु केली आहे. देशात बनलेली पहिली सेमीकंडक्टर चिप 2025 च्या मध्यापर्यंत येणार आहे. चीनच्या नाकावर टिच्चून सरळ त्यांच्या सीमेजवळ 27,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपने आसाममध्ये सुरु केले आहे. या प्रकल्पातून रोज 4.83 कोटी चिप तयार होणार आहेत. यामुळे चीनचा दबदबा मोडला जाणार आहे. टाटा नंतर अदानी समूहाने या क्षेत्रात पाऊल ठेवले. अदानी समुहाने टाटा समुहापेक्षा मोठा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. 83 हजार कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. यामुळे चीनची सेमीकंडक्टरमधील मक्तेदारी संपणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कायन्स टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेडचा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पात रोज 60 लाख सेमीकंडक्टर चिप बनवण्यात येणार आहे. हा प्रकल्प गुजरातमधील साणंदमध्ये होणार आहे. 3300 कोटी रुपयांची गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे.

सेमीकंडक्टर महत्वाचे का?

सेमीकंडक्टर म्हणजेच सिलिकॉन चिप प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनात वापरली जातो. परंतु सेमीकंडक्टरची निर्मिती आतापर्यंत भारतात होत नव्हती. भारत सेमीकंडक्टर आयात करत होता. जगभरात या क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे. सेमीकंडक्टर चिप शिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवता येत नाही. अगदी एलईडी बल्बपासून, कार, मोबाइलपर्यंत, टीव्ही, संगणक, लॅपटॉप, क्षेपणास्त्रांपर्यंत सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. सेमीकंडक्टरची चिप इलेक्ट्रॉनिक वस्तूमधील मेमरी ऑपरेट करण्याचे काम करते.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता