AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनचा पाऊस जितका जादा तितका पैसा मिळणार, ‘या’ कंपन्यातील गुंतवणुकीवर मोठ्या कमाईची संधी

मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते. शेतीशी निगडित असणाऱ्या कंपन्यांचं उत्पन्न देखील वाढतं.

मान्सूनचा पाऊस जितका जादा तितका पैसा मिळणार, 'या' कंपन्यातील गुंतवणुकीवर मोठ्या कमाईची संधी
प्रतिकात्मक फोटो
| Updated on: May 08, 2021 | 12:21 PM
Share

नवी दिल्ली :यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून साधारण राहणार असून सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यास अर्थव्यवस्थेवरही त्याचा चांगला परिणम दिसून येतो. पाऊस चांगला झाल्यास शेती चांगली पिकते. कंपन्यांना त्यांच्या उत्पादनसाठी कच्चा माल उपलब्ध होतो. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते. शेतीशी निगडित असणाऱ्या कंपन्यांचं उत्पन्न देखील वाढतं. (IMD predict normal monsoon this year experts said these share may give good return this year)

खरिप हंगामासाठी कोट्यवधी शेतकऱ्यांची तयारी

एका अहवालानुसार खरिप हंगामात मान्सून पावसावर भारतातील 20 कोटी शेतकरी शेती करतात. यामध्ये धानाची पेरणी, ऊस लागण, मका, कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांचा समावेश असतो.मात्र, देशातील एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 50 टक्केंच्या आसपास सिंचनाची सोय झाली असल्यानं शेतीच्या उत्पन्नावर त्याचा फरक पडतो. कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा 14 टक्केंवर गेला आहे.

Monsoon | मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस?

मान्सूनचा या कंपन्यांना फायदा

रॅलिस इंडिया

टाटा ग्रुपची रॅलिस इंडिया ही कृषी क्षेत्रातील केमिकल कंपनी आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील तीन ते सहा महिन्यात रॅलिस इंडिया कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीमधे तेजी येण्याची शक्यता आहे. या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यास ग्रामीण भागातून मागणी वाढते. जीसीएल सिक्योरिजनं रॅलिस इंडियाचे शेअर 370 रुपयांना खरेदी करावते असा सल्ला दिला आहे.

कोरोमंडल इंटरनॅशनल

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज हाऊसनं कीटकनाशक बनवणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये गुंतवूणक करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास सध्याचं मूल्य 728 रुपये आणि त्या वर 41 टक्के परतावा मिळू शकतो.

एस्कॉर्टस लिमिटेड

खरिप हंगामात शेती करण्यासाठी ट्रॅक्टर आणि इतर अवजारांची मागणी वाढते. याचा फायदा एस्कॉर्टस लिमिटेड या कंपनीला होईऊ शकते. केडिया कमोडिटीजचे संचालक अजय केडिया यांनी या कंपनीत 1280 बेस ठेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

इतर बातम्या:

‘आधी आमदार-खासदारांना कोरोनाची लस द्या’, हरियाणा सरकारचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र

भाजपात प्रवेश करताच बाळासाहेब सानप यांना मोठी जबाबदारी, चंद्रकांत पाटलांकडून नियुक्तीचे पत्र

(IMD predict normal monsoon this year experts said these share may give good return this year)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.