RBI PC | कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी RBI ने पेटारा उघडला, नाबार्ड, लघु उद्योगांसाठी 50 हजार कोटी

कोरोनामुळे जगावर मंदीचं सावट आहे. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केली. त्यामुळे हा दर 4 टक्क्यांवरुन 3.75 टक्क्यांवर आला.

RBI PC | कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी RBI ने पेटारा उघडला, नाबार्ड, लघु उद्योगांसाठी 50 हजार कोटी
Follow us
| Updated on: Apr 17, 2020 | 11:03 AM

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI PC India GDP growth rate) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, कोरोनाविरुद्धच्या लढ्याबाबत (RBI PC India GDP growth rate) माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केली. त्यामुळे हा दर 4 टक्क्यांवरुन 3.75 टक्क्यांवर आला. त्यामुळे सर्वप्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी होईल. याशिवाय बाजारात चलन तुटवडा जाणवू नये, यासाठी 50 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतीची घोषणा दास यांनी केली.

बाजारात भांडवल खेळतं राहावं यासाठी आरबीआयने मोठा निर्णय घेतला. नाबार्ड, लघुउद्योग, नॅशन हाऊसिंग बँकांसाठी 50 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आरबीआयने केली.

“कोरोनामुळे जगावर मंदीचं सावट आहे. मात्र भारताची आर्थिक स्थिती अन्य देशांच्या तुलनेत बरी आहे. कोरोनासंकटामुळे भारताचा GDP 1.9 टक्के राहील जो G20 देशांमध्ये सर्वाधिक असेल”, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. इतकंच नाही तर कोरोनामुळे जगभरात 9 ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान होईल, अशी भीती दास यांनी व्यक्त केली.

शक्तिकांत दास म्हणाले, “कोरोनाशी लढण्यासाठी शक्य ती सर्व उपाययोजना केली जात आहे. 150 पेक्षा अधिकारी क्वारंटाईन असूनही काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF ने अंदाज वर्तवला आहे की जगभरात मंदी येईल. त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे. अनेक देशात आयात-निर्यात घटली आहे.

कोरोना संकटामुळे भारताचा GDP विकासदर 1.9 राहील. मात्र हा G20 देशात सर्वाधिक असेल. जगभारत 9 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त नुकसानाचा अंदाज आहे. मात्र कोरोनाचं संकट टळेल तेव्हा भारताचा GDP विकासदर पुन्हा 7 टक्क्याच्या वेगाने वाढेल”

रिझर्व्ह बँकेच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • नाबार्ड, लघु उद्योग हाऊसिंगसाठी 50 हजार कोटी
  • नाबार्डला 25 हजार कोटी
  • छोट्य औद्योगिक विकास बँकांना 15 हजार कोटी
  • नॅशनल हाऊसिंग बँकांना 10 हजार कोटी
  • रिव्हर्स रेपो रेट 4 वरुन 3.75 टक्क्यांवर
  • भारताचा जीडीपी दर 1.9 राहण्याचा अंदाज
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.