AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौरउर्जेच्या क्षेत्रात भारताची मोठी झेप; अवघ्या सात वर्षांमध्ये क्षमतेत 17 पट विस्तार

पर्यावरण मंत्रालयातील सल्लागार/शास्त्रज्ञ जे.आर. भट्ट म्हणाले की, भारत जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के प्रतिनिधित्व करतो परंतु आमचे एकूण उत्सर्जन केवळ चार टक्के आहे आणि सध्याचे वार्षिक हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन केवळ 5 टक्के आहे.

सौरउर्जेच्या क्षेत्रात भारताची मोठी झेप; अवघ्या सात वर्षांमध्ये क्षमतेत 17 पट विस्तार
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 08, 2021 | 6:47 AM
Share

नवी दिल्ली: भारताने रविवारी संयुक्त राष्ट्र (UN) हवामान शिखर परिषदेत सांगितले की, देशाची सौर ऊर्जा क्षमता गेल्या सात वर्षांत 17 पटीने वाढून 45,000 मेगावॅट इतकी झाली आहे. भारतात जगातील 17 टक्के लोकसंख्या असूनही कर्ब उत्सर्जन जगातील एकूण उत्सर्जनाच्या केवळ चार टक्के असल्याचे भारताकडून सांगण्यात आले. COP-26 क्लायमेट समिटमध्ये 11 व्या शेअरिंग ऑफ आयडियाज (FSV) दरम्यान तिसरा द्विवार्षिक अपडेटेड रिपोर्ट (BUR) भारताकडून सादर करण्यात आला.

या अहवालात नमूद केल्यानुसार भारताने 2005-14 या कालावधीत आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) उत्सर्जनाच्या तीव्रतेत 24 टक्क्यांनी कपात केली आहे. तसेच सौर कार्यक्रमातही लक्षणीय वाढ नोंदवली आहे. भारताच्या वतीने, पर्यावरण मंत्रालयातील सल्लागार/शास्त्रज्ञ जे.आर. भट्ट म्हणाले की, भारत जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के प्रतिनिधित्व करतो परंतु आमचे एकूण उत्सर्जन केवळ चार टक्के आहे आणि सध्याचे वार्षिक हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन केवळ 5 टक्के आहे.

सौरउर्जेच्या क्षमतेत वाढ

गेल्या सात वर्षांत भारताची सौरऊर्जा क्षमता 17 पटीने वाढली आहे. ही क्षमता आता 45,000 मेगावॅटवर पोहोचली आहे. या परिषदेत सर्वांनी BUR आणि हवामानावरील भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी अलीकडेच म्हटले होते की, भारत अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पीएम मोदी म्हणाले की 2030 पर्यंत भारतातील निम्म्याहून अधिक ऊर्जा हरित ऊर्जेतून निर्माण होईल.

2030 पर्यंत नूतनीकरणीय स्त्रोतांद्वारे आवश्यक निम्मी ऊर्जा तयार करणे हे त्याचे दुसरे ध्येय आहे. भारत सध्या त्याच्या एकूण विजेच्या गरजेपैकी 70 टक्के कोळशावर अवलंबून आहे आणि 2030 पर्यंत 50 टक्के बिगरजीवाश्म इंधन मिळवणे आव्हानात्मक असेल. 2070 पर्यंत भारत शून्य कर्ब उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

संबंधित बातम्या:

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना

Solar Energy: घरावर सोलर पॅनल्स लावायचेत, जाणून घ्या किती खर्च येणार?

आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली