AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये खूप वेगाने वाढ, 2030 पर्यंत बाजार 40 अब्ज डॉलरचा होणार

भारतातील टायर -3, आणि टायर -4 शहरे अतिशय वेगाने डिजिटल केली जात आहेत. ग्रामीण भारतातही इंटरनेट पोहोचलेय आणि उर्वरित भागात त्याच्या पोहोचण्याचा वेग खूप जास्त आहे. इंटरनेटच्या वापरामुळे तेथील ग्राहकांच्या वागणुकीत आणि पद्धतीमध्येही बरेच बदल झालेत.

भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये खूप वेगाने वाढ, 2030 पर्यंत बाजार 40 अब्ज डॉलरचा होणार
e commerce
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 5:22 PM
Share

नवी दिल्लीः E-Commerce in India: भारतातील ई-कॉमर्सची बाजारपेठ खूप वेगाने वाढत आहे. एका अहवालानुसार, 2030 पर्यंत भारतातील ई-कॉमर्सचं आकार 40 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल. 2019 मध्ये ते फक्त 4 अब्ज डॉलर्स होते. या विकासदरामागे डिजिटल क्रांती हे एक मोठे कारण आहे. भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. यामुळेच ऑनलाईन शॉपिंगमध्ये बऱ्यापैकी तेजी दिसून येत आहे.

भारतातील टायर -3, आणि टायर -4 शहरांमध्ये अतिशय वेगाने डिजिटल क्रांती

भारतातील टायर -3, आणि टायर -4 शहरे अतिशय वेगाने डिजिटल केली जात आहेत. ग्रामीण भारतातही इंटरनेट पोहोचलेय आणि उर्वरित भागात त्याच्या पोहोचण्याचा वेग खूप जास्त आहे. इंटरनेटच्या वापरामुळे तेथील ग्राहकांच्या वागणुकीत आणि पद्धतीमध्येही बरेच बदल झालेत. ते आता ऑनलाईन खरेदीकडे आकर्षित झालेत. किरकोरळ बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय किरकोळ बाजारात ई-कॉमर्ससाठी भरपूर क्षमता आहे.

2026 पर्यंत बाजार 20 अब्ज डॉलर होणार

सल्लागार फर्म केर्नीच्या अहवालानुसार, 2019 मध्ये भारतातील ई-कॉमर्स बाजाराची किंमत 4 अब्ज डॉलर्स होती. 2026 पर्यंत त्याची किंमत 20 अब्ज डॉलर्स असेल, तर 2030 पर्यंत ती 40 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या अहवालात म्हटले आहे की, लाईफस्टाईल रिटेल मार्केट 2019 मध्ये 90 अब्ज डॉलर्सचे होते. त्याची किंमत 2026 पर्यंत 156 अब्ज डॉलर असेल, तर 2030 पर्यंत ती 215 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. यामध्ये परिधान, पादत्राणे, फॅशन अॅक्सेसरीज, कॉस्मेटिक, लहान उपकरणे आणि घरगुती राहणीमान यांचा समावेश आहे.

सध्या रिटेलमध्ये ई-कॉमर्सचे केवळ 4% योगदान

केर्नीच्या अहवालात म्हटले आहे की, सध्या किरकोळ बाजारात ई-कॉमर्सचे योगदान केवळ 4 टक्के आहे. 2030 मध्ये हे प्रमाण 19 टक्क्यांपर्यंत वाढेल. या अहवालात असेही म्हटले आहे की, 2026 पर्यंत भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 110 कोटी पार करेल. यातील एक तृतीयांश लोकांना ऑनलाईन शॉपिंगमध्ये खूप रस असेल.

संबंधित बातम्या

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCSने इतिहास रचला, बाजारमूल्य थेट 13 लाख कोटींच्या पार

खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार, 2000 ऐवजी 4000 मिळणार, सरकारची नेमकी योजना काय?

India’s e-commerce market is growing rapidly, reaching market 40 billion by 2030

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.