AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : फायनलवर पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास मालिका विजेता कोण?

India vs South Africa 3rd Odi Weather Prediction : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगतदार स्थितीत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असा असणार आहे.

IND vs SA : फायनलवर पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास मालिका विजेता कोण?
Visakhapatnam Cricket StadiumImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Dec 05, 2025 | 8:49 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका अंतिम टप्प्यात आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 6 डिसेंबरला विशाखापट्टणम इथे होणार आहे. 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा मालिकेच्या हिशोबाने निर्णायक ठरणार आहे. दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. अशात या मालिकेवर कोणता संघ नाव कोरणार? याची उत्सूकचा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकून भारत दौऱ्यातील सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर टीम इंडियासमोर तिसरा आणि अंतिम सामना जिंकून कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याचं आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने लोळवलं होतं.

भारताने रांचीत झालेल्या पहिल्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला होता. तर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात 359 धावांचा यशस्वी पाठलाग करत टीम इंडियावर मात केली होती. दक्षिण आफ्रिकेने यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात चढाओढ पाहायला मिळणार असल्याचं निश्चित आहे. तिसरा सामना पाऊस किंवा इतर कारणामुळे रद्द झाल्यास कोणता संघ मालिका विजेता ठरेल? तसेच विशाखापट्टणममध्ये हवामान कसं असेल? हे जाणून घेऊयात.

तिसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल?

एक्युवेदरनुसार, टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यादरम्यान ढगाळ हवामान असेल. मात्र पावसाची शक्यता नाही. विशाखापट्टणममध्ये सामन्यात दरम्यान कमाल तापमान हे 27 अंश सेल्सियस इतके असेल. तर रात्री या तापमानात घट होऊन ते 19 अंश सेल्सियस इतके होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सामना रद्द झाल्यास मालिका विजेता कोण?

विशाखापट्टणममध्ये आयोजित भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणाने रद्द झाला तर मालिका विजेता कोण असणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. हा सामना रद्द झाल्यास मालिका 1-1 ने बरोबरीत राहिल. द्विपक्षीय मालिकेसाठी सुपर ओव्हर, राखीव दिवस यासारखे नियम नसतात.

टीम इंडियाची विशाखापट्टणममधील कामगिरी कशी?

दरम्यान टीम इंडियाचा विशाखापट्टणममधील हा 11 वा एकदिवसीय सामना असणार आहे. भारताने आतापर्यंत या मैदानात 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर एकमेव सामना हा बरोबरीत सुटला होता.

Follow Us
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.