AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST : देशातील रस्ते अपघातात लाखोंचे बळी, जीएसटी ठरत आहे कारण? कोण करतंय कर रद्द करण्याची मागणी

GST : GST काय देशातील वाहनधारकांसाठी मृत्यूचं कारण ठरतं आहे? काय आहेत आरोप आणि तथ्य..

GST : देशातील रस्ते अपघातात लाखोंचे बळी, जीएसटी ठरत आहे कारण? कोण करतंय कर रद्द करण्याची मागणी
एक कर आयुष्यावर भारीImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 15, 2022 | 5:38 PM
Share

नवी दिल्ली : देशातील रस्ते अपघातात (Road Accident) अनेक दुचाकीस्वारांना (Two Wheeler Owner) त्यांचे प्राण गमवावे लागत आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकार जाणीव जागृती कार्यक्रमांवर कोट्यवधींचा खर्च करत आहे. हेल्मेट (Helmet) वापरण्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारही आग्रही आहे. पण एका करामुळे या मोहिमेला ब्रेक लागला आहे.

तर हेल्मेट आणि या एकूणच सर्व अपघातांवर केवळ एक कर भारी पडत असल्याचा दावा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघाने (International Road Federation-IRF) याविषयी आवाज उठविला आहे.

हेल्मेटवर वस्तू आणि सेवा कर (Goods And Service Tax-GST) लागू करण्याचा हा परिणाम असल्याची ओरड करण्यात येत आहे. IRFने हेल्मटवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी रीतसर केंद्र सरकारला मागणीचे पत्रच पाठविले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांना एक पत्र पाठवून IRFने हेल्मटवरील 18% जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. हा संपूर्ण जीएसटीच माफ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IRF चे अध्यक्ष एमेरिटस के. के. कपिला यांनी अर्थमंत्र्यांना याविषयीचे पत्र दिले आहे. त्यानुसार, रस्ते अपघात ही जागतिक समस्या आहे. जगभरातील रस्ते अपघातापैकी जवळपास 11 टक्के प्रमाण भारतात आहे.

रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, 2025 रस्ते अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूचे प्रमाण अर्ध्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य गाठायचे असेल तर केंद्र सरकारला 2030 पर्यंत हेल्मेटवर जीएसटी आकरणे टाळावे लागणार आहे.

आकड्यांनुसार, देशभरात जवळपास 500,000 रस्ते अपघात झाले. यामध्ये 150,000 नागरिकांना जीव गमावावा लागला. तर अपघातात जखमींचे प्रमाणही मोठे आहे. जखमींची संख्या 500,000 इतकी आहे.

या रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू अथवा कायमस्वरुपी अपंग येणारा वर्ग हा तरुणांचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील वाहनधारकांची संख्या मृत्यू आणि जखमीत मोठी आहे.

2019 मध्ये देशभरात एकूण 480,652 रस्ते अपघात झाले. त्यात 151,113 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 31.4% दुचाकीस्वारांचा मृत्यू ओढावला आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 129 नुसार हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?