AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST Collection : नागरीक महागाईने बेजार, सरकार GST मुळे मालामाल..

GST Collection : जीएसटी संकलनातून सरकारने लाख कोटींची कमाई केली आहे..

GST Collection : नागरीक महागाईने बेजार, सरकार GST मुळे मालामाल..
तिजोरीत आली लक्ष्मीImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 01, 2022 | 5:44 PM
Share

नवी दिल्ली : जीएसटी संकलनातून (GST Collection) केंद्र सरकार (Central Government) पुन्हा एकदा मालामाल झाले आहे. एकीकडे महागाई (Inflation) रेकॉर्ड तोडत असताना दुसरीकडे वस्तू आणि सेवा (GST) करातून तिजोरीत गंगाजळी येत आहे. ऑक्टोबर महिन्यातही रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन झाले आहे.

ऑक्टोबर महिन्यात जीएसटी वसुलीत विक्रम झाला आहे. 1.5 लाख कोटींचा जीएसटी या कालावधीत वसूल झाला आहे. अर्थमंत्रालयाने मंगळवारी याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे.

ऑक्टोबर हा दुसरा असा महिना ठरला, जेव्हा जीएसटी वसुली सर्वात चांगली झाली आहे. ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा होता. दिवाळी ही याच महिन्यात होती. त्यामुळे या काळात जनतेने जोरदार खरेदी केली. त्याचा फायदा सरकारी तिजोरीला झाला.

अर्थमंत्रालयानुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 1,51,718 कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली. यापूर्वी एप्रिल, 2022 मध्ये सर्वाधिक जीएसटी वसुली झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारला 1.50 लाख कोटींची कर प्राप्ती झाली होती.

ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय जीएसटीतून 26,039 कोटी, राज्यांच्या मदतीने 26,039 कोटी तर केंद्र आणि राज्यांनी संयुक्तरित्या 81,778 कोटी रुपये जमा केले आहे.

या कर वसुलीत आयात शुल्काचा ही मोठा वाटा आहे. आयात शुल्काच्या मदतीने सरकारी तिजोरीत 37,297 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर सेसच्या माध्यमातून 10,505 कोटी रुपये जमा झाले आहेत.

जीएसटी लागू झाल्यापासून ऑक्टोबर असा महिना ठरला ज्यावेळी जीएसटी वसुली 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे. याच वर्षात सर्वाधिक जीएसटी वसूल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर मधील जीएसटीचे आकडे सप्टेंबर महिन्यात जनरेट झालेल्या ई-वे बिलाआधारे प्राप्त होतात. सप्टेंबर महिन्यात 8.3 कोटींचे ई-वे बिल जनरेट झाले होते. हे आकडे ऑगस्ट महिन्यातील 7.7 कोटी ई-वे बिलपेक्षा जास्त आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.