AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बजेटमधील ‘तो’ निर्णय स्तुत्य, मनसेकडून अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार

आमच्या दोन्ही मागण्या प्राधान्याने जशाच्या तशा मान्य केल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार, असं ट्वीट बाळा नांदगावकरांनी केलं आहे

बजेटमधील 'तो' निर्णय स्तुत्य, मनसेकडून अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 01, 2020 | 3:44 PM
Share

मुंबई : बँक खात्यात जमा असलेल्या रकमेवर विमा हमीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय स्तुत्य असल्याचं सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे जाहीर आभार मानले (MNS Thanks FM Sitharaman on Budget) आहेत. या निर्णयानुसार बँक बुडाली, तर केंद्र सरकार ग्राहकांना एक लाखाऐवजी पाच लाख रुपये देणार आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरुन निर्मला सीतारमण यांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘धन की बात, जनता के साथ’ असं लिहित नांदगावकरांनी केलेले ट्वीट मनसेच्या अधिकृत अकाऊण्टवरुनही रिट्वीट करण्यात आले आहे.

‘अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर काल आम्ही अर्थमंत्र्यांनी ठेवींवरील विमा संरक्षण हे एक लाखावरुन वाढवून 5 लाख करावे आणि इन्कम टॅक्स कमी करुन जसा मोठया Corporate House (उद्योगधंदे) ना दिलासा दिला, तसाच मध्यमवर्गीयांना दिलासा द्यावा, अशी जाहीर मागणी आमच्या फेसबुक पोस्टव्दारे जाहीररित्या केल्याचं नांदगावकरांनी लिहिलं आहे.

आमच्या मागण्यांची दखल घेत दोन्ही मागण्या प्राधान्याने जशाच्या तशा मान्य केल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार. यामुळे बँकेतील ठेवीदारांना आणि मध्यमवर्गीय टॅक्स पेयर्सना नक्कीच मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. सरकारचा हा स्तुत्य निर्णय आहे आणि याचे आम्ही मनापासून स्वागत करतो, असंही त्यांनी पुढे लिहिलं आहे.

काय आहे निर्णय ?

सध्या एखादी बँक बुडाली, तर सरकार तिच्या ठेवीदारांना जास्तीत जास्त 1 लाख रुपये देते. पण ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेवर पाच लाख रुपयांची विमा हमी दिली जाईल. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी चांगली यंत्रणा तयार केली जात असल्याचंही सीतारमण यांनी अर्थसंकल्पात म्हटलं आहे.

बँक ठेवींवरील विमा वाढवण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आहे. सद्यस्थितीत एक लाख रुपये ही फारशी मोठी रक्कम होत नाही. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्याने बहुतांश लोक आपल्या आयुष्यभराचा कष्टार्जित पैसा बँकांमध्ये ठेवतात. पीएमसी बँक घोटाळ्यानंतर विमा रक्कम वाढवण्याच्या मागणीने जोर धरला होता. पीएमसी बँकेत कित्येक ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.

MNS Thanks FM Sitharaman on Budget

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली