AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर कंडिशनर आणि LED बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना फायदा, लाखो नव्या नोकऱ्याही मिळणार

मोदी सरकारने देशातील एअर कंडिशनर (AC) आणि एलईडी (LED) उत्पादनाबाबत मोठा निर्णय घेतलाय.

एअर कंडिशनर आणि LED बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना फायदा, लाखो नव्या नोकऱ्याही मिळणार
| Updated on: Apr 08, 2021 | 3:34 AM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारने देशातील एअर कंडिशनर (AC) आणि एलईडी (LED) उत्पादनाबाबत मोठा निर्णय घेतलाय. यानुसार आता देशातच या दोन्ही वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. यासाठी सरकारने या वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 4500 कोटी रुपयांचा इनसेंटिव्ह दिलाय. या निर्णयामुळे देशात रोजगाराची संख्या वाढेल आणि एसी आणि एलईडी या वस्तू देशाबाहेरन आयातही कराव्या लागणार नाही, अशी भूमिका सरकारने मांडलीय. स्वतः केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली (Modi government scheme on AC and LED under PLI Atmanirbhar Bharat).

सरकारचा नेमका निर्णय काय?

पीयूष गोयल म्हणाले, “या निर्णयामुळे अनेक नव्या नोकऱ्या तयार होतील. त्याशिवाय वीजेच्या किमतीवरही नियंत्रण येईल. या निर्णयामुळे थेट स्वरुपात जवळपास 32 हजार लोकांना रोजगार मिळेल. अप्रत्यक्षरित्या जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, अशी आशा आहे. केंद्र सरकारने व्हाईट गुड्सबाबत हा निर्णय घेतलाय. व्हाईट गुड्स म्हणजेच एअर कंडीशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रिक वस्तू होय. या वस्तूंच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने पीएलआय योजनेची घोषणा केलीय.”

“एक काळ होता जेव्हा भारतात एअर कंडीशनर बनायचे”

“एक काळ होता जेव्हा भारतात एअर कंडीशनर बनायचे. मात्र, हळूहळू या क्षेत्रात परदेशी कंपन्यांनी आपला जम बसवला. आता देशात 70-80 टक्के एअर कंडीशनर परदेशातून आयात करावे लागतात ही परिस्थिती आहे. म्हणूनच सरकारने यासाठी पीएलआय योजनेची घोषणा केलीय. जसजशी देशातील समृद्धी वाढेल तसतशी देशातील या वस्तूंची मागणीही वाढेल. या वस्तूंचा सीएजीआर (Compound Annual Growth Rate) 15-20 टक्के आहे,” असंही गोयल यांनी नमूद केलं.

सरकारची तयारी काय?

पुढील 5 वर्षांमध्ये या वस्तूंचं देशात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचा इंसेंटिव्ह देण्यात येईल. देशात वस्तूंचं उत्पादन झाल्याने भारताची आयात घटेल. याशिवाय देशात उत्पादन होईल तेव्हा आपोआप रोजगारही वाढतील. तज्ज्ञांनी म्हटलंय, “या योजनेंतर्गत परदेशी कंपन्यांना भारतात प्लँट उभा करण्यासोबतच भारतीय कंपन्यांना प्लँट उभा करण्यासाठी मदत केली जाईल. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी असणार आहे.”

हेही वाचा :

1 April पासून दूध ते टीव्ही आणि एसीही महागणार, किती बसणार खिशाला कात्री? वाचा सविस्तर

VIDEO : बूट सुकवण्यासाठी प्रवाशाचा जुगाड, थेट विमानातील एसीचा वापर

व्हिडीओ पाहा :

Modi government scheme on AC and LED under PLI Atmanirbhar Bharat

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.