AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम; फेल झाला असतो तर… देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा ऐकला का तो किस्सा?

Mukesh Ambani Big Risk : तुम्ही रिस्क घ्यायला, जोखीम घ्यायला घाबरता? भविष्यात काय होईल याचा अति विचार करता का? पण व्यवसायात रिस्क घेतल्याशिवाय काहीच होत नाही हे Mukesh Ambani यांच्या एका उदाहरणावरून समोर आले आहे. ते त्यांनीच सांगितले आहे.

ती आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम; फेल झाला असतो तर... देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा ऐकला का तो किस्सा?
मुकेश अंबानी यांचा यशाचा मंत्रImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 27, 2025 | 12:29 PM
Share

तुम्ही रिस्क घ्यायला, जोखीम घ्यायला घाबरता? भविष्यात काय होईल याचा अति विचार करता का? आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे एक उदाहरण तुम्ही समजावून घेतले तर तुम्ही कृती केल्याशिवाय राहणार नाही. मुकेश अंबानी यांनी त्यांनी आयुष्यात घेतलेली सर्वात मोठी जोखीम कोणती याची माहिती दिली. त्यांच्या मते हा मोठा रिस्क गेम होता. त्यांना अपयशाच्या कथा ऐकवण्यात येत होत्या. पण हा निर्णयच त्यांच्यासाठी बाजारातील हुकमी पत्ता ठरला.

कोणती आहे ती रिस्क?

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनातील एक किस्सा सांगितला. 2016 मध्ये रिलायन्स जिओ त्यांनी बाजारात आणले. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम असल्याचे ते म्हणाले. भारताच्या डिजिटल युगात हे मोठे पाऊल होते. जिओ ही इंटरनेट युगाची जणू क्रांतीच होती. जिओने इंटरनेटच्या जगतात अविश्वसनीय बदल घडवून आणला. अनेक जण हा निर्णय चुकीचा असल्याचे भाकीत करत होते. पण आपण ही रिस्क, जोखीम पत्करली आणि जिओ हा बाजारातील सर्वात मोठा खेळाडू झाला असे ते म्हणाले.

भारतात मोठे परिवर्तन घडले

McKinsey & Co च्या मंचावर आशियातील या श्रीमंताने रिलायन्सच्या यशाची वाट कशी सुकर झाली याचे भाकीत केले. मुलाखतीत त्यांनी, भारतात 4 जी मोबाईल नेटवर्कच्या पायाभूत सोयी-सुविधा आणण्याचा आम्ही विचार केला. मी संचालक मंडळासमोर याविषयीचा प्रस्ताव मांडला. मी माझ्या भावना मांडल्या. मला अनेक तज्ज्ञांनी भारत अशा डिजिटल सेवेसाठी तयार आहे का असा खोचक सवाल केला. त्यांच्या बोलण्याचा रोख मला माहिती होता.

पण मी माझ्या संचालक मंडळाला सांगितले की, सर्वात वाईट स्थितीत आपण फारशी कमाई करू शकणार नाही. ठीक आहे. कारण आपलाच पैसा आहे. पण आम्ही निर्णयाची अंमलबजावणी केली आणि भारतात डिजटलयाझेशनसाठी आपण काही तरी केले याचे समाधान मिळाले. हा निर्णय योग्य ठरला आणि भारतात मोठे परिवर्तन आले.

रिकाम्या हाती येणार, तसेच जाणार

“तुम्ही या जगात काहीएक घेऊन येत नाहीत आणि तुम्ही काहीच न घेता या जगाचा निरोप घेता. मग तुमच्यामागे काय शिल्लक उरत तर, ती आहे संस्था”, यावर आमचा विश्वास असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. जिओ हा सध्या भारतातील दूरसंचार क्षेत्रातील मोठा खेळाडू आहे. 470 दशलक्ष ग्राहकांचे हे विशाल नेटवर्क आहे. 5जी, क्लाउड कम्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता याक्षेत्रात या समूहाने मोठी आघाडी घेतली आहे.

महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान.
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ.
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे.
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!.
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक.
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.