AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता रेशन कार्डशी संबंधित काम कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये होणार, 23.64 कोटी लोकांना लाभ

डिजिटल इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली. यानुसार रेशन कार्डशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाणार आहे. रेशन कार्डशी संबंधित प्रत्येक समस्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) द्वारे सोडवली जाऊ शकते.

आता रेशन कार्डशी संबंधित काम कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये होणार, 23.64 कोटी लोकांना लाभ
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 8:00 AM
Share

नवी दिल्लीः अनेक शासकीय योजनांचे लाभ रेशन कार्डद्वारे दिले जात आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार रेशन कार्ड धारकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन देत आहे. अशा परिस्थितीत, रेशन कार्ड हा असा दस्तऐवज आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला सरकारकडून मोफत रेशन मिळते. शिधापत्रिकाधारकांच्या सोयीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी करार केला. याद्वारे देशभरातील 3.70 लाख CSC मधून शिधापत्रिका सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. या भागीदारीमुळे देशाच्या मोठ्या भागातील सुमारे 23.64 कोटी लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

डिजिटल इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली. यानुसार रेशन कार्डशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाणार आहे. रेशन कार्डशी संबंधित प्रत्येक समस्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) द्वारे सोडवली जाऊ शकते.

रेशन कार्डशी संबंधित ही कामे CSC वर केली जातील

डिजिटल इंडिया ट्विटनुसार, रेशन कार्ड अद्ययावत करणे, डुप्लिकेट रेशन कार्डची प्रिंट घेणे, रेशन कार्डला आधारशी जोडणे, रेशन कार्डची स्थिती तपासणे, नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे आणि रेशन कार्डशी संबंधित तक्रारी यासारख्या रेशन कार्ड सेवा देखील करता येतात.

एक राष्ट्र एक रेशन कार्ड

1 जून 2020 पासून, रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ देशात सुरू झाली. या योजनेमध्ये तुम्ही कोणत्याही राज्यात राहून रेशन खरेदी करू शकता. याचा अर्थ तुम्हाला कुठेही खाद्यपदार्थांची काळजी करण्याची गरज नाही.

10 प्रकारची कागदपत्रे आवश्यक

नवीन रेशन कार्ड बनवण्यापासून कार्डाचे नूतनीकरण करण्यापर्यंत किंवा त्यात नवीन सदस्याचे नाव जोडण्यापर्यंत, आता सुमारे 10 प्रकारची कागदपत्रे आवश्यक झालीत. अहवालांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हे नवीन सॉफ्टवेअरमुळे झाले, जे केंद्रीकृत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेशी संबंधित सॉफ्टवेअर केंद्र सरकारद्वारे चालवले जाते, ज्याद्वारे रेशन कार्ड बनवले जातात.

आता ही कागदपत्रे आवश्यक आहेत-

>> कुटुंबप्रमुखाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो >> रेशन कार्ड रद्द करण्याचे प्रमाणपत्र (आधी रद्द केले असल्यास) >> कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची छायाप्रत >> गॅस पासबुकची फोटोकॉपी >> संपूर्ण कुटुंब किंवा युनिटच्या आधार कार्डाची छायाप्रत >> सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र किंवा हायस्कूल प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्डची छायाप्रत >> जात प्रमाणपत्र (SC, ST, OBC) दस्तऐवजाची प्रत (लागू असल्यास) >> दिव्यांग ग्राहकांसाठी अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत >> मनरेगा जॉब कार्ड धारक असल्यास जॉब कार्डची छायाप्रत >> उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत >> पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल, पाणी बिल, घरपट्टी, भाडेनामा यापैकी कोणत्याही एकाची प्रत.

संबंधित बातम्या

कर वाचवण्यासाठी म्युच्युअल फंडाचे पैसे फ्लॅट खरेदीसाठी गुंतवू शकतो का? नियम काय?

रेल्वेची एक विशेष योजना, 50 हजार तरुणांना प्रशिक्षण, ‘या’ 4 ट्रेडमध्ये नोकरी

Now the work related to ration card will be done in the Common Service Center, benefiting 23.64 crore people

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.