AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office मध्ये धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं

मागील काही काळामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनांविषयी लोकांचे आकर्षण वाढले आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनीही इंडिया पोस्टच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.

Post Office मध्ये धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं
| Edited By: | Updated on: Mar 05, 2021 | 1:47 PM
Share

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी पोस्ट ऑफिसला बरीच प्रसिद्धी दिली आहे. मागील काही काळामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनांविषयी लोकांचे आकर्षण वाढले आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनीही इंडिया पोस्टच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. येथे तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. त्या बरोबरच तो खूप सुरक्षित मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा योजनेविषयी सांगणार आहोत जिथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर ही रक्कम 1 लाख 40 हजारांच्या जवळ जाईल. (Post Office invest 1 lakh national saving certificates get 40 thousands interest)

National Savings Certificates ही वन टाईम गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मुदतपूर्ती कालावधी 5 वर्षे आहे. ही योजना सध्या 6.8 टक्के व्याज दर देते, जे चक्रवाढ व्याज आहे आणि वार्षिक आधारावर गणना करते. यामध्ये मॅच्यूरिटिनंतरही व्याज दिले जाते. या योजनेत किमान 1000 रुपये आणि 100 रुपयांचे गुणक जमा केले जाऊ शकतात. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. कलम 80सी अंतर्गत पैसे गुंतवून तुम्हाला कपात करण्याचा फायदा मिळतो. कलम 80 सीची मर्यादा 1.5 लाख रुपये आहे.

6.8 टक्के व्याजदर

रिटर्नविषयी बोलायचं झालं तर, यामध्ये व्याज दर 6.8 टक्के झाला आहे. सरकार प्रत्येक तिमाहीत व्याज दराचा आढावा घेते. गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. याअंतर्गत तुम्ही 1000 रुपये गुंतवल्यास पाच वर्षानंतर तुमची रक्कम 1389.49 रुपये होईल. म्हणजे व्याज उत्पन्न 389.49 रुपये होते. अशाप्रकारे, 10 हजार रुपये गुंतवणूकीचे व्याज उत्पन्न 3890 रुपये आणि 1 लाख रुपये 38949 रुपये व्याज म्हणून गुंतवणूकीचे आहे.

Post Office मध्ये अकाऊंट असेल तर 1 एप्रिलपासून नियम

जर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकांनी आता AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टम) वर शुल्क आकरण्याचा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. मूलभूत बचत खातं असल्यास महिन्यातून चार वेळा पैसे काढणं विनामूल्य आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावरील शुल्क म्हणून किमान 25 रुपये किंवा मूल्याच्या 0.50 टक्के कपात केली जाईल. (Post Office invest 1 lakh national saving certificates get 40 thousands interest)

संबंधित बातम्या – 

ICICI बँकेचा धमाका, दहा वर्षातील सर्वात स्वस्त Home Loan

LIC मध्ये करा 1 लाखाची गुंतवणूक, एकत्र 20 लाख परत मिळण्याची गॅरंटी

Gold Silver Price : सोनं-चांदी झाली स्वस्त; वाचा पुढे सोनं वधारेल की आणखी घसरेल

Life Insurance Coporation of India: आपल्याकडे LIC पॉलिसी असल्यास लवकर करा हे काम, अन्यथा कोट्यवधींचे नुकसान

(Post Office invest 1 lakh national saving certificates get 40 thousands interest)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली