AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दशकात शेअर बाजाराचा 300 लाख कोटींचा टप्पा पार; कंगना रणौतचं ट्विट आलं चर्चेत

Kangana Ranaut : भारतीय शेअर बाजाराने गेल्या 10 वर्षांत मोठा पल्ला गाठला. या दशकात बाजाराने मोठी घौडदौड केली. आज तर बाजाराने 75,000 अंकांचा टप्पा पण ओलांडला. तर निफ्टीने पण रेकॉर्डचे तोरण लावले. सिनेअभिनेत्री ते आता नेता असा प्रवास करणाऱ्या कंगणा रणौतने यावर तिची अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एका दशकात शेअर बाजाराचा 300 लाख कोटींचा टप्पा पार; कंगना रणौतचं ट्विट आलं चर्चेत
शेअर बाजाराची घौडदौड, कंगनाचे ट्विट चर्चेत
| Updated on: Apr 09, 2024 | 11:49 AM
Share

भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही वर्षात मोठी मजल मारली. निफ्टी आणि सेन्सेक्सने मोठा पल्ला गाठला. गेल्या 10 वर्षांत शेअर बाजाराने मोठी मुसंडी मारली. बाजाराच्या या दैदिप्यमान यशाने गुंतवणूकदार हरकून गेला आहे. बाजाराने या काळात मोठे चढउतार पाहिले आहे. शेअर मार्केटने मंगळवारी विक्रमाची गुढी उभारली. सेन्सेक्सने 75,000 अंकांचा टप्पा आलोंडला तर मंगळवारी एक नवीन रेकॉर्ड केला. निफ्टी 22,765.10 अंकावर उघडला. बॉलिवूड अभिनेत्री ते आता नेता सा प्रवास करणाऱ्या कंगणा रणौतने या घौडदौडीचे कौतुक केले आहे. भारतीय शेअर बाजाराने गेल्या 10 वर्षांत 300 लाख कोटींचे मार्केट कॅप वाढवल्याची आकडेवारी कंगणाने दिली. तिने 2014 ते 2024 या काळातील आकडेवारी मांडली.

काय केले ट्विट

कंगणाने ट्विट केले आहे. “ भारतीय इतिहासात पहिल्यांदाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वरील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. ही चौपट वाढ केवळ या 10 वर्षांत झाली. मार्च 2014 (काँग्रेस सरकार)- 100 लाख कोटी, एप्रिल 2024 (मोदी सरकार)- 400 लाख कोटी रुपये. केवळ एका दशकात 300 लाख कोटी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर अतूट विश्वास दाखवला आहे.”

आज काय झाले ?

सकाळच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्स 75,124.28 अंकावर उघडला. हा सर्वकालीन उच्चांक आहे. तर सोमवारी मुंबई निर्देशांक 74,742.50 अंकांवर बंद झाला होता. सकाळी विक्रम नावावर केल्यावर सेन्सेक्समध्ये किंचित घसरण दिसून आली. पण लवकरच बाजाराने जम बसवला. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांवर सेन्सेक्स 338 अंकांनी वधारला. तो 75,080.24 अंकावर ट्रेड करत होता. तर सकाळच्या सत्रात निफ्टी तेजीसह 22,713.35 अंकावर व्यापार करत होता.

गेल्यावर्षी 300 कोटींचा ओलांडला टप्पा

सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 425.62 अंकांच्या उसळीसह 74,673.84 विक्रमी अंकावर पोहचला. बाजारातील तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारीतील भांडवल 4,01,16,018.89 कोटी रुपयांवर पोहचले. हा सर्वकालीन उच्चांक आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात 300 लाख कोटी रुपयांचा आकडा पार झाला होता. भारतीय बाजाराने गेल्या एकावर्षात 100 लाख कोटी रुपये जमा केले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.