AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन महिन्यांची स्थगिती द्या, RBI चा बँकांना सल्ला

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही (Three months moratorium for EMI) मैदानात उतरली आहे.

सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन महिन्यांची स्थगिती द्या, RBI चा बँकांना सल्ला
| Updated on: Mar 27, 2020 | 11:41 AM
Share

मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही (Three months moratorium for EMI) मैदानात उतरली आहे. लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात (Three months moratorium for EMI)  मोठी कपात केली. आरबीआयने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे रेपो दर 5.15 वरुन 4.40 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर 4.9 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्व प्रकाराच्या कर्जावरील व्याजदर कमी होतील.

यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेने अन्य बँकांना सल्ला दिला आहे की पुढील ३ महिने कोणत्याही कर्जावरील हप्ते अर्थात EMI ला स्थगिती द्या. आरबीआयने केवळ सल्ला दिला आहे. त्यामुळे हा सल्ला बँका ऐकणार का हे पाहावं लागेल.

लॉकडाऊनच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना अर्थात ‘बूस्ट’ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात 75 बेसिस पॉईंटची कपात केली.

याशिवाय कुठल्या कर्जावरील ईएमआयला स्थगिती द्यायची हे बँकांनीच ठरवावं, असंही आरबीआयने म्हटलं आहे. त्यामुळे किरकोळ, व्यावसायिक की वैयक्तिक कर्ज याबाबत सर्वसामान्यांना गोंधळ आहे.

दरम्यान, आरबीआयचा रेपो रेट कपातीचा निर्णया ऐतिहासिक आहे. कारण आरबीआयच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात आहे. गेल्या दोन तिमाहींमध्ये आरबीआयने रेपो दरांबाबत कोणतेही बदल केले नव्हते.

रेपो दरातील कपातीचा फायदा गृहकर्ज, कार किंवा अन्य प्रकारच्या कर्जासह ईएमआय भरणाऱ्या कोट्यवधी कर्जदारांना होणार आहे. याशिवाय नव्याने कर्ज घेणाऱ्यांनाही कमी व्याजदराने कर्ज मिळेल.

यावेळी गव्हर्नर शक्तिकांस दास म्हणाले, “कोरोनामुळे जगभरात आर्थिक मंदीचं सावट आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेवर आमचं लक्ष आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचं आरबीआयचं ध्येय आहे”

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.