AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Inflation : सणावर महागाईचे सावट! डाळीचे भाव असे भिडले गगनाला

RBI Inflation : महागाईविरोधात सरकारने शड्डू ठोकले आहे. त्यासाठी प्रयत्न पण करण्यात येत आहे. डाळीचे भाव गगनाला भिडलेले आहे. सप्टेंबर महिन्यापासून सणांचा हंगाम सुरु होत आहे. त्यामुळे डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहे. नाहीतर सणांचा आनंदावर विरजण पडेल.

RBI Inflation : सणावर महागाईचे सावट! डाळीचे भाव असे भिडले गगनाला
| Updated on: Sep 03, 2023 | 2:55 PM
Share

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : महागाईने (Inflation) जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नागरिकांना हैराण केले. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न सुरु केले आहे. निर्यात बंदी, आयात शुल्क अशा उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत. यापूर्वी काही डाळींनी केंद्र सरकारचे डोकेदुखी वाढवली होती. पण आता जवळपास सगळ्याच डाळींनी डोके वर काढले आहे. किरकोळ महागाईने दोन महिन्यात सर्वसामान्यांना आणि केंद्र सरकारला (Central Government) जेरीस आणले होते. आता डाळीचे दर (Pulses Rate Hike) अजून गगनाला भिडलेले आहेत. या दोन महिन्यांपासून डाळीच्या किंमतीत इतक्या टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यांपासून सणांचा हंगाम सुरु होत आहे. डाळीच्या दरवाढीला आताच लगाम घातला नाही तर सणाच्या उत्साहावर पाणी फेरले जाऊ शकते. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला डाळींनी आव्हान दिले आहे.

14 टक्के महागल्या डाळी

ग्राहक विभागाच्या आकड्यानुसार, 1 ऑगस्ट रोजी दिल्लीत हरबरा डाळीचा भाव 72 रुपये होता. 1 सप्टेंबर रोजी ही डाळ 82 रुपये प्रति किलोवर पोहचली. तर दिल्लीत तूरडाळीचा भाव 148 रुपये किलोहून 162 रुपये किलोवर पहोचली. या दरम्यान उडदाच्या डाळीचा भाव 5 रुपयांनी वाढून 132 रुपयांवर पोहचला. मसूर डाळ भाव 4 रुपये प्रति किलोने वाढून 91 रुपये झाली. डाळींचा भाव 14 टक्क्यांनी वाढला.

महागाई 15 महिन्यांच्या उच्चांकावर

महागाईने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेकॉर्ड ब्रेक केला. 30 ते 40 रुपये किलो टोमॅटोचा भाव थेट 300 ते 350 रुपये किलोवर पोहचला. किरकोळ महागाईचा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला. हा दर 7.44 टक्क्यांवर गेला. किरकोळ महागाईने या महिन्यात कळस गाठला होता.

भाज्यांनी वाढवला भाव

त्यात भाज्यांनी मोठी भुमिका निभावली. किरकोळ महागाई दर 15 टक्क्यांनी वाढला. टोमॅटोनी त्यात सर्वाधिक भर घातली. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर दर 7.44 टक्के नोंदविण्यात आला. गावात महागाई दर 7.63 टक्के होता तर शहरात किरकोळ महागाई 7.2 टक्के होता. जुलै महिन्यातच भाज्यांची महागाई 37.34 टक्के होती. डाळींचा महागाई दर 13.27 टक्के होता. ऑगस्ट महिन्यात डाळींच्या किंमतीत जोरदार तेजी आली.

खरीप आला धोक्यात

इकडे खरीप धोक्यात आला आहे. डाळींसाठीची प्रमुख उत्पादक राज्यांना पावसाने ओढ दिल्याने फटका बसला आहे. यावेळी खरीपातील डाळींचे उत्पादन घसरण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबरपासून देशातील खरीपाचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 11 लाख हेक्टरने कमी होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एकूण शेती 119.09 लाख हेक्टर नोंदविण्यात आली आहे. यामध्ये तूर, उडीद आणि मुगाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा घटण्याचा अंदाज आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा