AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI कडून बँकेसंदर्भात नवीन अहवाल जारी, अटींचे पालन केले, तरच बँक अन् ग्राहकांना फायदा

सामान्य नागरिक आणि भागधारक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अहवालावर आपला प्रतिसाद सादर करू शकतात. समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या सूचनांचा आरबीआयकडून विचार केला जातो.

RBI कडून बँकेसंदर्भात नवीन अहवाल जारी, अटींचे पालन केले, तरच बँक अन् ग्राहकांना फायदा
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 8:28 AM
Share

नवी दिल्लीः आरबीआयने प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांसाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केलाय. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर आज याबद्दल माहिती देताना सामान्य नागरिक आणि भागधारकांकडून सूचनाही मागवण्यात आल्यात. सामान्य नागरिक आणि भागधारक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अहवालावर आपला प्रतिसाद सादर करू शकतात. समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या सूचनांचा आरबीआयकडून विचार केला जातो.

एन. एस. विश्वनाथन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समिती स्थापन

या वर्षी 5 फेब्रुवारीला भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरणासह विकासात्मक आणि नियामक धोरणांबाबत एक निवेदन जारी केले. यासह रिझर्व्ह बँकेने प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांवर माजी डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या समितीची जबाबदारी या बँकांची समस्या समजून घेऊन या क्षेत्रासाठी रोडमॅप तयार करण्याची होती. यासाठी बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 मधील अलीकडील सुधारणाही लक्षात ठेवल्या जाणार होत्या.

समितीच्या शिफारशी काय आहेत?

आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने किमान 300 कोटी रुपयांच्या भांडवलासह छत्री संस्था स्थापन करण्याची सूचना केली. ही संस्था शहरी सहकारी बँकांसाठी स्वयंनियमन करणारे युनिटच्या स्वरूपात काम करेल. नंतर ते सदस्य बँकांद्वारे युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित केले जाऊ शकते. या संस्थेला माहिती तंत्रज्ञान सहाय्य देण्यासाठी RBI एकवेळ अनुदान देखील देण्याचा विचार करू शकते.

निव्वळ किमतीसह इतर अटींबाबत शिफारस काय?

आरबीआय समितीने शिफारस केली आहे की, शहरी सहकारी बँका 4-स्तरीय आधारावर नियंत्रित केल्या जाऊ शकतात. हा स्तर त्यांच्या ठेवीच्या आधारावर निश्चित केला जातो. कोणत्याही एका जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बँकांची किमान संपत्ती किमान 2 कोटी रुपये असावी. पहिल्या स्तरामध्ये समाविष्ट बँकांची निव्वळ किंमत किमान 5 कोटी रुपये असावी. या बँकांचे किमान सीआरएआर 9 ते 14 टक्के असावे. याशिवाय काही अटी देखील निश्चित केल्या जातील. नियामक अटी पूर्ण झाल्यास या बँका जिल्ह्यात 10 अतिरिक्त शाखा उघडू शकतात.

संबंधित बातम्या

RBI issues new report on banks, only if the conditions are met, the bank will benefit the customers

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...