AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI कडून बँकेसंदर्भात नवीन अहवाल जारी, अटींचे पालन केले, तरच बँक अन् ग्राहकांना फायदा

सामान्य नागरिक आणि भागधारक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अहवालावर आपला प्रतिसाद सादर करू शकतात. समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या सूचनांचा आरबीआयकडून विचार केला जातो.

RBI कडून बँकेसंदर्भात नवीन अहवाल जारी, अटींचे पालन केले, तरच बँक अन् ग्राहकांना फायदा
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 8:28 AM
Share

नवी दिल्लीः आरबीआयने प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांसाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केलाय. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर आज याबद्दल माहिती देताना सामान्य नागरिक आणि भागधारकांकडून सूचनाही मागवण्यात आल्यात. सामान्य नागरिक आणि भागधारक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अहवालावर आपला प्रतिसाद सादर करू शकतात. समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या सूचनांचा आरबीआयकडून विचार केला जातो.

एन. एस. विश्वनाथन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समिती स्थापन

या वर्षी 5 फेब्रुवारीला भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरणासह विकासात्मक आणि नियामक धोरणांबाबत एक निवेदन जारी केले. यासह रिझर्व्ह बँकेने प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांवर माजी डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या समितीची जबाबदारी या बँकांची समस्या समजून घेऊन या क्षेत्रासाठी रोडमॅप तयार करण्याची होती. यासाठी बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 मधील अलीकडील सुधारणाही लक्षात ठेवल्या जाणार होत्या.

समितीच्या शिफारशी काय आहेत?

आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने किमान 300 कोटी रुपयांच्या भांडवलासह छत्री संस्था स्थापन करण्याची सूचना केली. ही संस्था शहरी सहकारी बँकांसाठी स्वयंनियमन करणारे युनिटच्या स्वरूपात काम करेल. नंतर ते सदस्य बँकांद्वारे युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित केले जाऊ शकते. या संस्थेला माहिती तंत्रज्ञान सहाय्य देण्यासाठी RBI एकवेळ अनुदान देखील देण्याचा विचार करू शकते.

निव्वळ किमतीसह इतर अटींबाबत शिफारस काय?

आरबीआय समितीने शिफारस केली आहे की, शहरी सहकारी बँका 4-स्तरीय आधारावर नियंत्रित केल्या जाऊ शकतात. हा स्तर त्यांच्या ठेवीच्या आधारावर निश्चित केला जातो. कोणत्याही एका जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बँकांची किमान संपत्ती किमान 2 कोटी रुपये असावी. पहिल्या स्तरामध्ये समाविष्ट बँकांची निव्वळ किंमत किमान 5 कोटी रुपये असावी. या बँकांचे किमान सीआरएआर 9 ते 14 टक्के असावे. याशिवाय काही अटी देखील निश्चित केल्या जातील. नियामक अटी पूर्ण झाल्यास या बँका जिल्ह्यात 10 अतिरिक्त शाखा उघडू शकतात.

संबंधित बातम्या

RBI issues new report on banks, only if the conditions are met, the bank will benefit the customers

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.