AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारच्या निर्णयानंतर साखर कारखान्याचा मोठा निर्णय; ‘या’ गोष्टीसाठी 450 कोटींची तजवीज

Ethanol production | श्री रेणुका शुगर्स या कंपनीने इथेनॉल उत्पादन मोठ्याप्रमाणावर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीकडून 450 रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता श्री रेणुका शुगर्सकडून दिवसाला 430 किलोलीटर ऐवजी 1400 किलोलीटर इथेनॉलचे उत्पादन केले जाईल.

मोदी सरकारच्या निर्णयानंतर साखर कारखान्याचा मोठा निर्णय; 'या' गोष्टीसाठी 450 कोटींची तजवीज
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 7:31 AM
Share

नवी दिल्ली: देशभरात इंधनाच्या वाढत असलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (ethanol) मिसळवणे (ब्लेडिंग) बंधनकारक केले होते. 2025 पर्यंत देशभरात इथेनॉल ब्लेडिंगचे प्रमाण 20 टक्क्यांवर नेण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आता देशभरातील साखर कारखाने इथेनॉल निर्मितीसाठी पुढे सरसावले आहेत. (Shree Renuka Sugers will invest 450 crore for increasing ethanol production capicity)

श्री रेणुका शुगर्स या कंपनीने इथेनॉल उत्पादन मोठ्याप्रमाणावर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीकडून 450 रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता श्री रेणुका शुगर्सकडून दिवसाला 430 किलोलीटर ऐवजी 1400 किलोलीटर इथेनॉलचे उत्पादन केले जाईल.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य

पुढील दोन वर्षांत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे देशाला महाग तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यास मदत होईल. केंद्र सरकारने 2025 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे ठरवले होते. परंतु आता सरकारने निर्णय बदलला आहे. सरकारला हे लक्ष्य आता 2023 पूर्वी साध्य करायचे आहे.

गडकरी म्हणाले की, सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. 2014 मध्ये हेच प्रमाण 1-1.5 टक्के इतकं होतं. ते म्हणाले की इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे आणि ते आपल्याला आयात करावं लागत नाही. हे इंधन कमी खर्चिक, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे. फ्लेक्स-फ्यूल इंजिन अनिवार्य केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. कारण आपला देश कॉर्न सरप्लस आहे, आपण शुगर-गहु सरप्लस आहोत, आपल्याकडे हे सर्व धान्य साठवण्यासाठी जागा नाही.

इथेनॉल म्हणजे काय?

इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं. इथेनॉल ऊसापासून तयार होतं. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.

इतर बातम्या:

पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ तेलावर गाड्या चालणार, 60 रुपयात एक लीटर इंधन

सरकारची नवी E-Vehicle Policy सादर, चार्जिंग स्टेशनसाठी 10 लाखांचे अनुदान

Petrol & Diesel: राज्यात इंधनाच्या दराचा भडका; आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

(Shree Renuka Sugers will invest 450 crore for increasing ethanol production capicity)

Follow Us
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.