AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaiguru Achar Harinder : ऐकावे ते नवलच! दुधामुळेच नाही तर गायीच्या शेणामुळे झाला करोडपती

Jaiguru Achar Harinder : अभियंत्याच्या नोकरीला रामराम ठोकून या तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. गायीच्या दुधापासून नाही तर शेणामुळे त्याने आतापर्यंत कोट्यवधी रुपये कमावले आहे.

Jaiguru Achar Harinder : ऐकावे ते नवलच! दुधामुळेच नाही तर गायीच्या शेणामुळे झाला करोडपती
| Updated on: May 12, 2023 | 8:23 PM
Share

नवी दिल्ली : मनाचा निश्चय पक्का असेल तर हुकमाचा एक्का व्हायला वेळ लागत नाही. कोणताच व्यवसाय छोटा-मोठा नसतो. छोट्या व्यवसायाला मेहनतीचं आणि कल्पकतेची जोड दिली तर तुम्हाला साम्राज्य तयार करायला वेळ लागत नाही. आजकाल नोकरीतील तोच तोचपणाला कंटाळून अनेक तरुण स्टार्टअपकडे (Start Up) वळले आहेत. मनासारखं काम करता येत असल्याने त्यांना आकाश ठेंगण झालं आहे. कर्नाटकातील या तरुणाने असेच मनाचे ऐकले आणि आज तो कमी वयात मोठा व्यावसायिक झाला आहे. अवघ्या 26 वर्षाच्या जयगुरु आचार हिंडरने (Jaiguru Achar Harinder) तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. तो एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनिअर होता.

शेणापासून उत्पन्न जयगुरुने हटके काम केलं. दुधाचा व्यवसाय तर सगळेच करतात. त्यापासून बक्कळ कमाई पण करतात. पण जयगुरुने दुधा व्यतिरिक्त गायीच्या शेणावर लक्ष केंद्रीत केले. त्याच्या गायींसाठीच्या फार्मवर गायींना दररोज अंघोळ घालण्यात येते. हे पाणी पण जयगुरु आयडियाची कल्पना वापरुन विक्री करत आहे. या व्यवसायातून त्याला जोरदार नफा झाला आहे.

गावखेड्यात मोठा व्यवसाय जयगुरु आचार हिंडर दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुंडुरु गावातील रहिवाशी आहे. त्याने विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, पुत्तूर येथून पदवी मिळवली. त्यानंतर तो एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. सर्वसामान्य मुलासारखंच त्याचं आयुष्य होतं. त्याला 22000 रुपये पगार होता. पण या कामात त्याचं काही मन रमेना. कोरोना काळात 2019 मध्ये त्याने या नोकरीला रामराम ठोकला. पण मनात असंख्य विचार होते. काहीतरी वेगळं करायचं हे विचारचक्र डोक्यात फिरत होते.

युट्यूबने दिली आयडियाची कल्पना जयगुरुचे पूर्वीपासूनच शेतीत मन रमत होते. वडिलांना तो शेतात मदत करत होता. त्यांच्याकडे 10 गाई होत्या. त्याने शेतात प्रयोग केले. त्यासाठी तो युट्यूबवर अनेक व्हिडिओ बघत होता. त्याने पटियाला येथे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने दूध डेअरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याने हळूहळू त्याच्या शेतात खास शेड केले आणि 130 गाई खरेदी केल्या. त्यानंतर पैसा येत गेला. नवीन कल्पना सूचत गेल्या. हा व्यवसाय वाढविण्यासाठी त्याने 10 एकर जमीन खरेदी केली.

शेणखताची आयडिया शेणखताविषयी त्याच्या मनात विचार घोळत होते. मग त्याला कल्पना सूचली. त्याने शेण पटकन वाळवून त्याचा भूगा करणारी मशीन खरेदी केली. दरमहिन्याला तो गायीच्या शेणाच्या 100 पोते विकतो. त्यामाध्यमातून त्याची जोरदार कमाई होते. एवढंच नाही तर गायीच्या शेणाचे इतर उपयोग लक्षात घेत त्याने त्याचे मार्केटिंग सुरु केले आहे. गाय आणि गोठा स्वच्छ केल्यानंतर ते पाणी एका ठिकाणी जमा करुन ते टँकरमध्ये भरण्यात येते. हे पाणी फळ बागायतदार आणि इतर शेतकरी खरेदी करतात.

इतकी कमाई जयगुरु प्रत्येक दिवशी 750 लिटर दूध आणि महिन्याला 30-40 लिटर तूप विक्री करतो. 10 एकर परिसरात त्याचे हा व्यवसाय चालतो. हा सर्व भाग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कॅमेऱ्यांनी व्यापलेला आहे. दरमहिन्याला त्याला 10 लाखांची कमाई होते. आता जयगुरुने पुढील प्रकल्प हाती घेतला आहे. दुधाच्या पदार्थांचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच गायीच्या शेणापासून इतर वस्तू तयार करण्याच्या प्रकल्पावर काम सुरु करण्यात येणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.