AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjwala Yojana | गाजावाजाच भारी, उज्ज्वला योजनेत एक ही सिलिंडर नाही दारी, 4.3 कोटी लाभार्थ्यांनी फिरवली पाठ

Ujjwala Yojana | धूर मुक्त भारताचे सरकारचे स्वप्न अखेर भंगले. गाजावाजा करुन सुरु केलेल्या उज्ज्वला योजनेची पोलखोल सरकारी आकड्यातूनच समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील 4 कोटी 13 लाख लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलिंडर पुन्हा आणले नसल्याचे संसदेत सरकारने स्पष्ट केले.

Ujjwala Yojana | गाजावाजाच भारी, उज्ज्वला योजनेत एक ही सिलिंडर नाही दारी, 4.3 कोटी लाभार्थ्यांनी फिरवली पाठ
उज्ज्वला योजनेकडे पाठImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 02, 2022 | 3:41 PM
Share

Ujjwala Yojana News | धूरमुक्त भारत करण्याच्या सरकारच्या स्वप्नांना अखेर लाभार्थ्यांनीच सुरुंग लावला. गाजावाजा करुन सुरु केलेल्या उज्ज्वला योजनेची पोलखोल सरकारी आकड्यातूनच समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील (Ujjwala Yojana Scheme) 4 कोटी 13 लाख लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलिंडर पुन्हा घरी न आणल्याचे संसदेत सरकारने स्पष्ट केले. उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनच्या रिफिलिंगची आकडेवारी केंद्र सरकारने काल संसदेत दिली. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री (State Minister) रामेश्वर तेली यांनी याविषयीची माहिती राज्यसभेत दिली. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली, मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरचे (LPG) दर जैसे थेच आहेत. सरकारने केवळ पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांसाठी अनुदान (LPG) कायम ठेवले आहे. उर्वरित एलपीजी ग्राहकांचे अनुदान रद्द करण्यात आले आहे. परंतु उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकदाही एलपीजी सिलिंडर पुन्हा भरले नसल्याचे सरकारने संसदेत मांडलेल्या आकडेवारीतून दिसून आले

काय सांगते आकडेवारी

उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनच्या रिफिलिंगची आकडेवारी राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत सादर केली.उज्ज्वला योजनेतील 4 कोटी 13 लाख लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलिंडर पुन्हा भरले नाहीत, अशी माहिती एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी दिली. त्याचबरोबर 7.67 कोटी लाभार्थ्यांनी फक्त एकदाच सिलिंडर भरले आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संबंधित माहिती मागवली होती.

सातत्याने फिरवली पाठ

रामेश्वर तेली यांनी गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी मांडली. त्यात 2017-18 दरम्यान 46 लाख उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी एकही सिलिंडर रिफिल केला नाही. त्याचबरोबर एकेकाळी रिफिलर्सची संख्या 1.19 कोटी होती. 2018-19 मध्ये 1.24 कोटी, 2019-20 मध्ये 1.41 कोटी, 2020-21 मध्ये 10 लाख आणि 2021-22 मध्ये 92 लाख लाभार्थ्यांनी एकदाही सिलिंडर भरला नसल्याचे त्यांनी सांगितले.

किती मिळाले अनुदान

राज्यमंत्री तेली यांनी सांगितले की, 2018-19 मध्ये 2.90 कोटी, 2019-20 मध्ये 1.83 कोटी, 2020-21 मध्ये 67 लाख आणि 2021-22 मध्ये 1.08 कोटी असे मिळून फक्त एकदाच सिलिंडर रिफिल झाले आहेत. 2021-22 या वर्षात एकूण 30.53 कोटी घरगुती गॅस ग्राहकांपैकी 2.11 कोटी ग्राहकांनी एकदाही गॅस सिलेंडर रिफिल केलेले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली. त्याचबरोबर 2.91 कोटी ग्राहकांनी एकदा घरगुती गॅस सिलेंडर भरला आहे. एप्रिल 2020 पर्यंत उज्ज्वला गॅसचे सिलेंडर भरल्यावर गरिबांना 162 रुपये अनुदान मिळत होते.

काय आहे नवा नियम?

उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने 9 कोटी मोफत एलपीजी कनेक्शनचे वाटप केले आहे. या सर्व लोकांनी एलपीजी सबसिडी म्हणून प्रति सिलिंडर 200 रुपये निश्चित केले आहेत. सरकारने वर्षाला 12 सिलिंडरवर अनुदान देण्याचा नियम केला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना सरकार मोफत गॅस कनेक्शन देते.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?