AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salary : नोकरीचं टेन्शन सोडा, नोकरी गमावली तरी मिळेल दर महिन्याला पगार, योजना तरी काय?

Salary : आता नोकरीची चिंता कोण करी? काय आहे ही सरकारची योजना..

Salary : नोकरीचं टेन्शन सोडा, नोकरी गमावली तरी मिळेल दर महिन्याला पगार, योजना तरी काय?
नोकरीची चिंता सोडाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 22, 2022 | 8:56 PM
Share

नवी दिल्ली : कपात, मंदी (Recession), व्यवसायातील तोटा अशा बातम्या सातत्याने येऊन धडकत आहेत. चीनमध्ये कोरोनाचे (China Corona) थैमान सुरु आहे. जगभरात पुन्हा कोरोनाची भीती येऊ घातली आहे. अनेक अर्थव्यवस्थेला (Economy) त्यामुळे हादरे बसत असताना, कंपन्यांनी सावध भूमिका घेतली आहे. अशावेळी मागील अनुभव पाहता प्रत्येक कर्मचाऱ्याने शहाणपणाचं धोरण राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे अचानक नोकरी गेली (Job loss) तरी तुम्हाला रोजचा व्यवहार करता येणे सोप्पं व्हावं यासाठी काही तजवीज होऊ शकते.

नोकरदार वर्गाला कोरोनाची भीती सतावत आहे. त्याचा सर्व खर्च महिन्याकाठी अथवा महिन्याच्या पहिल्या दिवशी मिळणाऱ्या पगारावर अवलंबून असतो. घर खर्च, मुलांचे शिक्षण, ईएमआय, इतर खर्च, दवाखाना, औषधांवरचा खर्च वेतनातून भागविल्या जातो. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी गेली तरी दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळत राहील..

बेरोजगारी भत्ता तुम्ही ऐकला असेल, पण बेरोजगारीचा विमा ही असतो. नोकरी गेल्यानंतर तुम्हाला दर महा एक ठराविक रक्कम मिळते. जर नोकरी गमावली नाही तर एका निश्चित कालावधीत या योजनेतंर्गत तुम्हाला विम्याचा लाभ मिळेल. भारतात अजून तरी नोकरी गेल्यानंतर दरमहा निश्चित विम्याची प्रथा नाही. तसा प्लॅनही बाजारात लोकप्रिय नाही.

काही विमा योजना आणि पॉलिसी आहेत, ज्या नोकरी गमावल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात आर्थिक सुरक्षा देतात. भारतात कर्मचाऱ्यांची सुरक्षा कर्मचारी राज्य विमा म्हणजे ESI करते. त्याआधारे कर्मचाऱ्याला उपचार आणि इतर सुविधा प्रदान करण्यात येतात. अत्यल्प दरात ही सुविधा मिळते.

राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना (Rajiv Gandhi Shramik Kalyan Yojana) आणि अटल विमा व्यक्ती कल्याण योजना (Atal Beemti Vyakti Kalyan Yojana) या दोन योजना तुमच्या मदतीला धावून येतील. या योजना दरमहा एक निश्चित रक्कम देतील.

राजीव गांधी श्रमिक कल्याण योजनेत लोकांना मदत करण्यात येते. नोकरी गेल्यानंतर आर्थिक मदत मिळते. ESIC ने 2005 मध्ये ही योजना अंमलात आणली होती. नोकरी गेल्यानंतर 50 रक्कम बेरोजगारी भत्याच्या रुपाने मिळते. ही मदत दोन वर्षापर्यंत मिळते.

अटल विमा व्यक्ति कल्याण योजनेतही नोकरी गेल्यानंतर केंद्र सरकार आर्थिक मदत करते. या योजनेत केवळ तीन महिन्यांसाठी आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेत तुमच्या वेतनाच्या 50 टक्के हिश्यावर दावा करता येतो. नोकरी सुटल्याच्या एका महिन्यानंतरच दावा करता येतो.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.