AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्टार्टअप बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. स्टार्ट अपमध्ये सरकारचा जेवढा कमी हस्तक्षेप राहील, तेवढी ही योजना यशस्वी होऊ शकते, असे गोयल यांनी म्हटले आहे. सोबतच स्टार्ट अप योजनेमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांना जास्तीत जास्त प्रोहत्सान देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहेत.

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 10:43 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्टार्टअप बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. स्टार्ट अपमध्ये सरकारचा जेवढा कमी हस्तक्षेप राहील, तेवढी ही योजना यशस्वी होऊ शकते, असे गोयल यांनी म्हटले आहे. सोबतच स्टार्ट अप योजनेमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांना जास्तीत जास्त प्रोहत्सान देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहेत. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. येणाऱ्या काळात स्टार्ट अपला लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा मिळून देण्यात येणार असल्याचेही गोयल म्हणाले आहेत.

स्टार्ट अपमध्ये भारत करतोय जगाचे नेतृत्व 

यावेळी बोलताना गोयल म्हणाले की, आजचे युग हे स्टार्ट अपचे आहे. स्टार्ट अपमध्ये भारत जगाचे नेतृत्व करत आहे. मात्र स्टार्ट अपमधून सुरू झालेलया व्यवसायात सरकारने हस्तक्षेप न करणे हेच त्या उद्योगाच्या हिताचे आहे. सरकारचा हस्तक्षेप नसल्याने संबंधित उद्योजकाला आपल्या वस्तुचे स्वरूप, किंमत आणि गुणवत्ता याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेता येतात, त्यातून उद्योगाची प्रगती होते. तसेच उद्योगाला सरकारने आधार न दिल्यास उद्योजक आपल्या स्वता:च्या हिमतीवर उभे राहातात. त्यामुळे स्टार्ट अपच्या कुठल्याही धोरणांमध्ये दखल न देण्याची भूमिका केंद्राकडून घेण्यात आली आहे.

70 पेक्षा अधिक स्टार्ट अपचा समावेश यूनिकॉर्न श्रेणीमध्ये

आज भारतातील तब्बल सत्तरपेक्षा अधिक स्टार्ट अपचा समावेश हा यूनिकॉर्न श्रेणीमध्ये झाला आहे. जागतिक स्तारावर ही संख्या सर्वाधिक आहे. जर या स्टार्ट अपने सरकारची मदत घेतली असती. तर कोरोना काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फटका त्यांना बसला असता. केंद्राकडून महिलांना स्टार्ट अप सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत  आहे. हळूहळू  स्टाप्ट अप सुरू करणाऱ्या महिलांची संख्य वाढत असून, हे एक दिलासादायक चित्र आहे. यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी  येत्या काळात स्टार्ट अपचा मोठा उपोयग होऊ शकतो.

संबंधित बातम्या 

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, दोन दिवसांच्या आत पूर्ण करा पैशांचे व्यवहार

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक