AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्टार्टअप बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. स्टार्ट अपमध्ये सरकारचा जेवढा कमी हस्तक्षेप राहील, तेवढी ही योजना यशस्वी होऊ शकते, असे गोयल यांनी म्हटले आहे. सोबतच स्टार्ट अप योजनेमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांना जास्तीत जास्त प्रोहत्सान देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहेत.

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 10:43 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्टार्टअप बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. स्टार्ट अपमध्ये सरकारचा जेवढा कमी हस्तक्षेप राहील, तेवढी ही योजना यशस्वी होऊ शकते, असे गोयल यांनी म्हटले आहे. सोबतच स्टार्ट अप योजनेमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांना जास्तीत जास्त प्रोहत्सान देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहेत. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. येणाऱ्या काळात स्टार्ट अपला लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा मिळून देण्यात येणार असल्याचेही गोयल म्हणाले आहेत.

स्टार्ट अपमध्ये भारत करतोय जगाचे नेतृत्व 

यावेळी बोलताना गोयल म्हणाले की, आजचे युग हे स्टार्ट अपचे आहे. स्टार्ट अपमध्ये भारत जगाचे नेतृत्व करत आहे. मात्र स्टार्ट अपमधून सुरू झालेलया व्यवसायात सरकारने हस्तक्षेप न करणे हेच त्या उद्योगाच्या हिताचे आहे. सरकारचा हस्तक्षेप नसल्याने संबंधित उद्योजकाला आपल्या वस्तुचे स्वरूप, किंमत आणि गुणवत्ता याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेता येतात, त्यातून उद्योगाची प्रगती होते. तसेच उद्योगाला सरकारने आधार न दिल्यास उद्योजक आपल्या स्वता:च्या हिमतीवर उभे राहातात. त्यामुळे स्टार्ट अपच्या कुठल्याही धोरणांमध्ये दखल न देण्याची भूमिका केंद्राकडून घेण्यात आली आहे.

70 पेक्षा अधिक स्टार्ट अपचा समावेश यूनिकॉर्न श्रेणीमध्ये

आज भारतातील तब्बल सत्तरपेक्षा अधिक स्टार्ट अपचा समावेश हा यूनिकॉर्न श्रेणीमध्ये झाला आहे. जागतिक स्तारावर ही संख्या सर्वाधिक आहे. जर या स्टार्ट अपने सरकारची मदत घेतली असती. तर कोरोना काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फटका त्यांना बसला असता. केंद्राकडून महिलांना स्टार्ट अप सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत  आहे. हळूहळू  स्टाप्ट अप सुरू करणाऱ्या महिलांची संख्य वाढत असून, हे एक दिलासादायक चित्र आहे. यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी  येत्या काळात स्टार्ट अपचा मोठा उपोयग होऊ शकतो.

संबंधित बातम्या 

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, दोन दिवसांच्या आत पूर्ण करा पैशांचे व्यवहार

Follow Us
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.