Gram Suraksha Yojana | पोस्टाची योजनाच न्यारी, दररोज 50 रुपयांच्या बचतीत व्हा लखपती

Gram Suraksha Yojana News : ग्राम सुरक्षा योजनेत अवघ्या 50 रुपयांच्या बचतीत लखपती होता येते. 19 वर्षे ते 55 वर्षातील कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करु शकतो.

Gram Suraksha Yojana | पोस्टाची योजनाच न्यारी, दररोज 50 रुपयांच्या बचतीत व्हा लखपती
अवघ्या 50 रुपयात लखपतीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 6:04 PM

Post Office Gram Suraksha Yojana | भारतीय टपाल खात्याच्या (Post Office) गुंतवणुकीसाठी अनेक योजना (Investment Plan) आहेत. विशेष म्हणजे या सर्व योजना भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतातील एक मोठा वर्ग या योजनांवर डोळे झाकून विश्वास टाकतो. कारण या योजनांना सरकारचे संरक्षण (Government Security) मिळते. बँकांपेक्षा ही या योजनांमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित असते. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना तर कमालीच्या लोकप्रिय आहेत. यामध्ये गुंतवणुकदारांना चांगला परतावा (Good Return) मिळतो. पोस्ट खात्याने ग्रामीण जीवन विम्यातंर्गत अनेक योजना बाजारात उतरवल्या आहेत. याच योजनेतील ग्राम सुरक्षा योजना ( Gram Suraksha Yojana News) आहे. ही योजना लोकप्रिय आहे. या योजनेत दररोज अवघे 50 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. या योजनेतील गुंतवणुकीविषयी आणि परताव्याविषयी जाणून घेऊयात.

कोण करु शकते गुंतवणूक

ग्राम सुरक्षा योजनेत 19 ते 55 वर्षे वयातील कोणताही व्यक्ती गुंतवणूक करु शकतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणुकीवर कमीतकमी 10,000 ते कमाल 10 लाखांपर्यंतची एकूण एकूण रक्कम मिळू शकते. या योजनेत गुंतवणुकीसाठी अनेक हप्त्यांचे पर्याय देण्यात आले आहे. गुंतवणूकदार मासिक, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक आधारावर हप्त्याची निवड करु शकतो आणि त्याप्रमाणे या योजनेत गुंतवणूक करु शकतो. या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल तर पोस्ट कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती मिळू शकते. 1995 साली ग्रामीण टपाल जीवन विमा योजना सुरु करण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेला डोळ्यासमोर ठेवत ही योजना सुरु करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

योजनेत मिळतो बोनस

या योजनेत गुंतवणूक केल्यास चार वर्षानंतर कर्ज सुविधा मिळते. जर एखाद्या पॉलिसीधारकाला ही स्कीम सरेंडर करायची असेल तर ती परत करता येते. योजना सुरु झाल्याच्या तीन वर्षानंतर ही सुविधा मिळते. या योजनेतंर्गत गुंतवणूकीच्या पाच वर्षानंतर बोनस मिळते.

किती रक्कमेचा परतावा

ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत पात्र व्यक्तीला दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे दररोज केवळ 50 रुपयांची गुतंवणूक करावी लागते. कालावधी पूर्ण झाल्यावर त्याला 35 लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो.

योजनेतंर्गत जर तुम्ही 19 वर्षाचे असताना 10 लाख रुपयांच्या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतणूक करता, तर तुम्हाला वयाच्या 55 व्या वर्षी दर महिन्याला 1,515 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तर 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये दर महिन्याला जमा करावे लागतील.

गुंतवणूकदाराला वयाची 55 व्या वर्षी योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर 31,60,000 रुपये, 58 व्या वर्षी कालावधी पूर्ण झाल्यावर 33,40,000 रुपये आणि वयाची 60 वर्षे पूर्ण करणा-या व्यक्तीला 34.60 लाख रुपये मिळतील. ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत व्यक्ती 80 वर्षांचा झाल्यावर ही रक्कम त्याला देण्यात येते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर उत्तराधिका-याला ही रक्कम देण्यात येते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.