AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना परीक्षा ना मुलाखत, थेट करा रेल्वे विभागात नोकरी, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी

रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट बंपर भरती सुरू आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावेत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

ना परीक्षा ना मुलाखत, थेट करा रेल्वे विभागात नोकरी, सरकारी नोकरी करण्याची हीच 'ती' सुवर्णसंधी
| Updated on: Dec 15, 2023 | 2:40 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 3015 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. आजपासून इच्छुक उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया पश्चिम मध्य रेल्वेकडून राबवली जात आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला wcr.indianrailways.gov.in. या साईटवर आरामात मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवार हा बारावी पास असावा. तसेच बारावीमध्ये उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असावेत. फक्त हेच नाही तर उमेदवाराचा संबंधित आयटीआय ट्रेड झालेला असणे आवश्यक आहे. आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 24 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 136 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना 36 रूपये फिस ही भरावी लागणार. उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी अर्ज करावीत.

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.