AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाने नाक कापले तर दुसऱ्याने गळाच चिरला; पती-पत्नीमध्ये नक्की काय घडले?

जिल्ह्यातील नालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपुरा गावात ही घटना घडली आहे. गावातील रहिवासी त्रिलोक पाटीदार आणि त्यांची पत्नी बबिता पाटीदार हे शेतात मजुरीसाठी गेले होते. शेतातच काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला.

एकाने नाक कापले तर दुसऱ्याने गळाच चिरला; पती-पत्नीमध्ये नक्की काय घडले?
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 06, 2023 | 7:29 PM
Share

आगर माळवा : मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणातून झालेल्या वाद पत्नीच्या जीवावर बेतला आहे. शेतात काम करत असतानाच पती-पत्नीमध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादातून पत्नीने आधी पत्नीचे नाक कापले. यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर आरोपी पतीलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरोपी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बबिता पाटीदार आणि त्रिलोक पाटीदार अशी पती-पत्नीची नावे आहेत.

शेतात काम करत असतानाच झाला वाद

जिल्ह्यातील नालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपुरा गावात ही घटना घडली आहे. गावातील रहिवासी त्रिलोक पाटीदार आणि त्यांची पत्नी बबिता पाटीदार हे शेतात मजुरीसाठी गेले होते. शेतातच काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला.

आधी पतीचे नाक कापले, मग पत्नीवर वार केले

भांडण इतके विकोपाला गेले की बबिता हिने पतीच्या नाकावरच धारदार शस्त्राने वार केला. यात पती त्रिलोकचे नाक कापले. यामुळे तो चांगलाच संतापला. त्रिलोकनेही हातात धारदार शस्त्र घेऊन पत्नी बबिताच्या मानेवर वार केले.

रक्तस्त्राव झाल्याने पत्नीचा मृत्यू

यात बबिताच्या मानेवर तीव्र जखम होऊन रक्तस्त्राव झाल्याने तिचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नालखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसडीओपी पल्लवी शुक्ला यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

कौटुंबिक कारणातून वाद झाल्याचे निष्पन्न

एसडीओपी पल्लवी शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. दरम्यान, दोघांनी एकमेकांवर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात पतीचे नाक कापले गेले आणि पत्नीचा मृत्यू झाला.

जखमी पतीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी शेतातून विषाची बाटलीही जप्त केली आहे. पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Follow Us