पत्नी सारखी मोबाईलवर बिझी रहायची, संतापलेल्या पतीने जे केले त्यानंतर नाराज महिलेने थेट आयुष्यच संपवले !

दररोजच्या वादातून पती पिंटूने पत्नीला मोबाईल वापरण्यास मनाई केली. यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणातून पतीने पत्नीचा मोबाईल तोडला.

पत्नी सारखी मोबाईलवर बिझी रहायची, संतापलेल्या पतीने जे केले त्यानंतर नाराज महिलेने थेट आयुष्यच संपवले !
मोबाईलवरुन झालेल्या वादातून पत्नीने स्वतःला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 2:10 PM

पलामू : आजच्या आधुनिक जीवनात मोबाईल आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. तथापि मोबाईलचे चांगले आणि वाईट दोन्ही फायदे आहेत. कोरोनामुळे मोबाईलचा अधिक वापर होऊ लागला आहे. ऑनलाईन स्टडी, वर्क फ्रॉम होम या कारणांमुळे मोबाईलचा वापर अधिक वाढला. मात्र याचा परिणाम म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच मोबाईल अधिक अधीन झाले. मोबाईलच्या अतिवापरामुळे संसारातही भांडण होऊ लागली आहेत. अति मोबाईलचा वापर करण्यास मनाई केली तो अहंकाराचा प्रश्न बनला आहे. अशीच एक घटना झारखंडमधील पलामू येथे उघडकीस आली आहे. मोबाईलवरुन झालेल्या वादातून पतीने मोबाईल तोडला म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

पती सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहायची

पलामूमधील झूरहीटोला येथे पिंटू चौधरी आपली पत्नी चिंतादेवी विनयसोबत राहतो. चिंतादेवीला मोबाईलचे अत्याधिक व्यसन होते. ती सतत मोबाईलवर व्यस्त राहत होती. या कारणावरुन पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे.

पतीने मोबाईल तोडल्याने नाराज पत्नीने केली आत्महत्या

दररोजच्या वादातून पती पिंटूने पत्नीला मोबाईल वापरण्यास मनाई केली. यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणातून पतीने पत्नीचा मोबाईल तोडला. पतीने मोबाईल तोडल्यामुळे नाराज झालेल्या पत्नीने खोलीत जाऊन साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

हे सुद्धा वाचा

रेहला पोलिसात घटनेची नोंद

याबाबत रेहला पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी पतीसह सर्व कुटुंबीयांची चौकशी करत घटनेची नोंद केली आहे.

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. एका मोबाईलमुळे महिलेने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.