AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी तरुणाचे अपहरण केले, मग मारहाण, मेला समजून शेतात टाकून पळाले, पण…

दोन तरुणांमध्ये वैयक्तिक वाद होता. हा वाद टोकाला गेला. मग पुढे जे घडले ते भयंकर होते. मात्र दैव बलवत्तर म्हणून नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

आधी तरुणाचे अपहरण केले, मग मारहाण, मेला समजून शेतात टाकून पळाले, पण...
वैयक्तिक वादातून तरुणाचे अपहरण करुन मारहाणImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 29, 2023 | 9:29 AM
Share

कोल्हापूर : वैयक्तिक वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण केल्याची घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे. मारहाणीत तरुण मृत झाला समजून तरुणाला उसाच्या शेतात फेकून पळ काढला. मात्र सतर्क नागरिकांमुळे तरुणाचे प्राण वाचवण्यास यश आले आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात ही घटना घडली. तीर्थराज उपाध्ये असे पीडित तरुणाचे नाव आहे. घटनेप्रकरणी चौघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. दरम्यान जखमी तरुणावर इचलकंरजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जयसिंगपूर स्थानकातून तरुणाचे अपहरण

तीर्थराज हा कोल्हापूरहून रेल्वेने जयसिंगपूरला आला. जयसिंगपूरला स्टेशनला पार्क केलेली मोटारसायकल काढत असतानाच चार संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी बळजबरीने तीर्थराजला गाडीत टाकून त्याचे अपहरण केले. यानंतर तीर्थराजच्या भावाने त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसात दिली. भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहृत तरुणाचा शोध सुरु केला.

मोबाईल लोकेशनवरुन तरुणाचा शोध घेतला

पोलिसांनी तरुणाच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला. यानंतर फरार झालेल्या आरोपींना सापळा रचून निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथून अटक केली. अनिल ऊर्फ अण्णासो राघू कजयाप्पा, चेतन बाबासाहेब बसर्गे, सुनील शिवाजी खिलारे, संतोष तात्यासाब एकोंडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

वैयक्तिक वादातून आरोपींनी केले हे कृत्य

तीर्थराज आणि अनिल अण्णासो यांच्यात वैयक्तिक वाद होता. याच वादातून अण्णासो याने मावसभाऊ चेतन बसर्गे आणि अन्य दोन मित्रांसोबत मिळून तीर्थराजचे अपहरण केले. यानंतर त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो मेला समजून त्याला उसाच्या शेतात टाकून आरोपींनी पळ काढला. मात्र सतर्क नागरिकांनी पाहिले अन् तरुणाचे प्राण वाचवले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.