AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : खारट नाष्टा दिल्याने पतीने पत्नीचा गळा दाबला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ठाणे (thane) जिल्ह्यातील भाईंदर (Bhayandar) टाऊनशिपमध्ये पतीने आपल्या ४० वर्षीय पत्नीची हत्या केली आहे. सकाळचा नाष्टा अधिक खारट असल्याने गळा दाबल्याची कबूली आरोपीने पोलिसांना (police) दिली आहे. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारात घडली आहे. पतीने नाष्टा केल्यानंतर पत्नीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime News : खारट नाष्टा दिल्याने पतीने पत्नीचा गळा दाबला,  आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बाथरुमध्ये हिटरचा शॉक लागून मुलाचा मृत्यूImage Credit source: टीव्ही9
| Updated on: Apr 17, 2022 | 11:26 AM
Share

ठाणे – ठाणे (thane) जिल्ह्यातील भाईंदर (Bhayandar) टाऊनशिपमध्ये पतीने आपल्या ४० वर्षीय पत्नीची हत्या केली आहे. सकाळचा नाष्टा अधिक खारट असल्याने गळा दाबल्याची कबूली आरोपीने पोलिसांना (police) दिली आहे. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारात घडली आहे. पतीने नाष्टा केल्यानंतर पत्नीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचं नाव निलेश घाघ असं आहे. पत्नीचं नाव निर्मला असं आहे. क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

भाईंदर पूर्वेतील फाटक रोड परिसरात घाघ कुटुंब राहायला आहे. पत्नीने दिलेल्या ‘खिचडी’मध्ये जास्त मीठ असल्याने आरोपी नाराज होता. त्यामुळे आरोपीने कृत्य केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे नाव 46 वर्षीय निलेश घाघ असे आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास नाष्टा केल्यानंतर आरोपीने पत्नी निर्मला हिचा गळा दाबून खून केला.

नाष्टा वेळेवर न दिल्याने मारली गोळी

काल अशाच प्रकारची घटना घडली असून, चहासोबत नाश्ता वेळेवर न दिल्याने संतापलेल्या सासरच्या मंडळींनी सुनेची गोळ्या झाडून हत्या केली होती. राबोडी भागातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय सुनेला पोटात गोळी लागल्याने तिचा मृत्यू झाला.

Maharashtra : वरुणराजाच्या कृपादृष्टीनंतरही पाणीसाठा 62 टक्क्यांवर, राज्यात 34 टॅंकरने पाणीपुरवठा

Jalgaon: जळगावमध्ये WhatsApp स्टेटसवरून वाद; मध्यरात्रीनंतर दोन गटांमध्ये दगडफेक, नेमके प्रकरण काय?

Ajit Pawar On James Laine : तुम्ही कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका; जेम्स लेन प्रकरणावर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.