AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon: जळगावमध्ये WhatsApp स्टेटसवरून वाद; मध्यरात्रीनंतर दोन गटांमध्ये दगडफेक, नेमके प्रकरण काय?

जळगावमध्ये सध्या सर्वत्र शांतता आहे. कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही. तरुणांनी सोशल मीडियावर भान ठेवून व्यक्त व्हावे. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहेत.

Jalgaon: जळगावमध्ये WhatsApp स्टेटसवरून वाद; मध्यरात्रीनंतर दोन गटांमध्ये दगडफेक, नेमके प्रकरण काय?
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 10:42 AM
Share

जळगावः जळगावमध्ये (Jalgaon) एका आक्षेपार्ह व्हॉटस्अॅप (WhatsApp) स्टेटसवरून दोन गटांत वाद निर्माण झाला. त्यामुळे मध्यरात्रीनंतर समाजकंटकांच्या दोन गटांनी दगडफेक केली. या घटनेत दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून, एक तरुण जखमी झाला आहे. दगडफेकीमध्ये रहीस युसूफ मणियार यांच्या मालकीची आयशर ट्रक व डॉ. सुफियान शाहा यांच्या मालकीची फोरव्हिलर सेंट्रो कारच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी हे रस्त्याने मलिक नगरमध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्याही जळगावमध्ये शांतता आहे. मात्र, सोशल मीडियावरील एखादा मेसेजही नाहक शहरास वेठीस धरून सामाजिक वातावरण गढूळ करतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हे पाहता प्रत्येकाने एक सजग नागरिक म्हणून सोशल मीडियावर व्यक्त होताना सामाजिक भान जपावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नेमके प्रकरण काय?

जळगावमध्ये एका तरुणाने आक्षेपार्ह व्हॉटसअॅप स्टेटस ठेवले होते. या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात नेत काही तरुणांनी मारहाण केली. काही जणांनी मध्यस्थी करून ही मारहाण सोडवली. मात्र, त्यानंतर शहरात अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे मलिकनगर आणि नसीमन कॉलनीमध्ये काही समजाकंटकांनी दगडफेक केली. शिरसोली गावात हनुमान जंयतीनिमित्त पोलीस बंदोबस्त होता. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली. तेव्हा एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

शहरात सध्या शांतता

जळगावमध्ये काल रात्री हा प्रकार घडला. मात्र, सध्या शहरात सर्वत्र शांतता आहे. कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही. तरुणांनी सोशल मीडियावर भान ठेवून व्यक्त व्हावे. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेचा अधिक तपास सुरू केल्याची माहिती आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.