AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola : उद्धट उत्तर दिल्याने गावकऱ्यांनी मेट्रोकारलो कंपनीच्या गाड्या फोडल्या, माजी सरपंचांसह 21 जणांवर गुन्हा दाखल

माजी सरपंच दिपक इंगळे हे आपल्या मोटारसायकलने निघाले असता त्यांचा अपघात झाला. त्यावेळी चिडलेल्या सरपंचांनी तिथल्या कंपनीच्या लोकांना जाब विचारला. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्यांनी उद्धट उत्तरे दिली. तसेच त्यांची तिथे शाब्दीक बाचाबाची झाली.

Akola : उद्धट उत्तर दिल्याने गावकऱ्यांनी मेट्रोकारलो कंपनीच्या गाड्या फोडल्या, माजी सरपंचांसह 21 जणांवर गुन्हा दाखल
उद्धट उत्तर दिल्याने गावकऱ्यांनी मेट्रोकारलो कंपनीच्या गाड्या फोडल्याImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 8:54 AM
Share

अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातल्या पातूर ते अकोला रोडच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. शनिवारी भंडारज (Bhandaraj) येथील माजी सरपंच दिपक इंगळे (Deepik Ingale) हे आपल्या मोटारसायकलने जात असता त्यांचा अपघात झाला. त्यावेळी दिपक इंगळे यांनी याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. जाब विचारल्यानंतर सरपंचांना कंपनीच्या लोकांनी उद्धट उत्तर दिले. ही माहिती गावातील नागरिकांना समजताचं त्यांनी मेट्रोकारलो कंपनीच्या गाड्या फोडल्या. 13 ते 14 गाड्यांच्या काचा फोडून मशीन चे सुद्धा नुकसान करण्यात तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं

माजी सरपंच दिपक इंगळे हे आपल्या मोटारसायकलने निघाले असता त्यांचा अपघात झाला. त्यावेळी चिडलेल्या सरपंचांनी तिथल्या कंपनीच्या लोकांना जाब विचारला. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्यांनी उद्धट उत्तरे दिली. तसेच त्यांची तिथे शाब्दीक बाचाबाची झाली. ही खबर गावातील नागरिकांना लागली. त्यांनी लोखंडी साहित्य आणि लाकडी का़ठ्यांच्या साहाय्याने कंपनीच्या 13 ते 14 गाड्या फोडल्या. तसेच तिथं असलेलं कंपनीचं मशीन देखील फोडलं आहे. या मारहाणमध्ये कंपनीचे कर्मचारी कृष्णा अष्णप्पा लोखंडे, संजयसिंह जुदागीरसिंग, रितुराज श्रीबाळकृष्ण, विनोद विद्यासागर भारती इत्यादी कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबत पातूर पोलीस स्टेशनला गावातील 21 युवकांवरती गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पातूर पोलीस करत आहे.

अनेक युवकांची नावे तक्रारीत

काही दिवसापूर्वी भंडारज येथे गावातील महिलांनी गावातील अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारला होता. या घटनेचा राग म्हणून शनिवारी झालेल्या घटनेत गावात नसलेल्या अनेक युवकांची नावे टाकण्यात आली असल्याची चर्चा जोरात सुरु होती.

पण या प्रकरणाला राजकीय किनार असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे. तपास पुर्ण झाल्यानंतर याबाबतचं खरं सत्य बाहेर येईल.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.