AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alibag Family Suicide : बातमी वाचून काळीज करपेल, दोन चिमुकल्यांना विष देऊन आई-वडिलांनी घेतला गळफास, अलिबागच्या कॉटेजमध्ये काय घडलं?

11 मे पासून अलिबागमध्ये हे चौघे वास्तव्यास होते. काल रूममध्ये गेल्यानंतर सकाळ पासून दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेडवर तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला.

Alibag Family Suicide : बातमी वाचून काळीज करपेल, दोन चिमुकल्यांना विष देऊन आई-वडिलांनी घेतला गळफास, अलिबागच्या कॉटेजमध्ये काय घडलं?
अलिबागमध्ये एकाच कॉटेजमध्ये चार मृत्यू, एक अख्खं कुटूंब संपलं, हत्या-आत्महत्येनं नवी मुंबई हादरलीImage Credit source: tv9
| Updated on: May 17, 2022 | 9:11 PM
Share

अलिबाग : फिरण्याच्या उद्देशातून आलेल्या महिला आणि पुरुषाने मुला मुलीला विष (Poison) देवून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना अलिबागमध्ये (Alibag) घडली आहे. शहरातील ब्लॅसम कॉटेजमध्ये ही घटना घडली असून हे सर्व जण कळंबोली येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. 11 मे पासून अलिबागमध्ये हे चौघे वास्तव्यास होते. काल रूममध्ये गेल्यानंतर सकाळ पासून दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेडवर तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला. याप्रकरणी अलिबाग पोलिसांना कळवताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेने सध्या अलिबागसह महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे.

आत्यहत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

या महिला आणि पुरुषाने मुला मुलीला विष देवून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या का केली? या भयानक प्रकरामागे नेमकं कारण काय आहे? याची मात्र अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. पोलिसांकडून या कॉटेजच्या कर्मचाऱ्यांचे आणि मालकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवी मुंबईतील कळंबोलतील तपास केल्यावरच पोलिसांना या भयानक प्रकरणामागे नेमकं कारण काय हे समजण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलिबाग पोलीस लवकच नवी मुंबईत दाखल होत या ठिकाणी तपास करून या छडा लावण्याची शक्यता आहे. यात पोलिसांच्या तपासात आता कोणतं कारण बाहेर येतंय. याबाबत लवकरच खुलासा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

कौटुंबिक वादातून घडला प्रकार?

असे प्रकार अनेकदा कौटुंबिक वाद किंवा आर्थिक चिंतेतून घडत असतात. या प्रकरणातही या दोन्ही शक्यता असू शकतात. मात्र पोलिसांचा तपास पूर्ण होण्याआधी कुठल्याही अंदाजाने निष्कर्ष लावणे योग्य नाही कारण यामागे काही आणखी वेगळे कारणही असू शकते. या जोडप्याने हे पाऊल उचलताना लहान मुलांचाही विचार केला नाही. विष देऊन त्यांचाही  जीव घेतला आहे. त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणाने सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा छडा लावणे तसेच यामागील खऱ्या कारणापर्यंत पोहोचणे हे आता पोलिसांसमोरील मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला आचा चांगलाच वेग आला आहे. यात ते नवी मुंबई पोलिसांची मदत घेण्याचीही शक्यता आहे.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.