AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Siddiqui Murder : सलमान खान फक्त नावाला, बिश्नोई गँगचा खरा गेम आहे दुसराच

Baba Siddiqui Murder : माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने मुंबईत दहशत निर्माण झाली आहे. मुंबई पुन्हा एकदा टोळी युद्धाकडे जाणार की काय? अशी शंकेची पाल मनात चुकचुकतेय. मुंबईत थंड पडलेली अंडरवर्ल्डची दुनिया पुन्हा एकदा सक्रीय होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याची सुरुवात केली आहे.

Baba Siddiqui Murder : सलमान खान फक्त नावाला, बिश्नोई गँगचा खरा गेम आहे दुसराच
सलमान खानImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 15, 2024 | 9:58 AM
Share

Baba Siddique Death : माया नगरी मुंबई आणि बॉलिवूडवर 1990 च्या दशकापासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातून मुंबईत टोळी युद्ध भडकलं होतं. आता एनसीपी नेते आणि रियल एस्टेटमधील मोठे व्यावसायिक बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर परिस्थिती बदलली आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये सुद्धा कंफ्यूजन आहे. उत्तर भारतात दबदबा निर्माण करणारा लॉरेंस बिश्नोई आता बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करुन त्याने बॉलिवूडचा तसा संदेश सुद्धा दिला आहे. डी कंपनीची दादागिरी चालणार नाही, हे त्याने साफ संकेत दिलेत.

दाऊद इब्राहिम आता भाई राहिलेला नाही, हे लॉरेन्सने सांगण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत रियल एस्टेट आणि बॉलिवूडवर एकछत्र अमल ठेवण्यासाठी 90 च्या दशकात दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, छोटा राजन, हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार आणि अरुण गवळी अशा अनेक गँग्स तयार झाल्या. त्यावेळी मुंबईत भरपूर गँगवॉर झालं. रस्त्यावर खुलेआम गोळीबाराच्या घटना घडल्या. अखेर डी कंपनी सर्वांवर भारी पडली.

डी गँगची पकड कमजोर

बॉलीवूड ते रियल एस्टेटपर्यंत इच्छा नसतानाही डी कंपनीला हफ्ता द्यावा लागला. मुंबईतल्या गँग्समध्ये आजपर्यंत डी कंपनी सर्वात मोठी मानली जात होती. अनेक फिल्म्सचे स्क्रिप्ट, गाणी, अगदी हिरो-हिरॉईन दाऊदच्या इशाऱ्यावरुन बदलण्यात आले. वेळेबरोबर मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या मुसक्या आवळल्या. दाऊद आज देशाबाहेर आहे. त्यामुळे डी कंपनीची मुंबई आणि बॉलिवूडवरची पकड आता कमजोर झाली आहे. अशा स्थितीत आता बिश्नोई गँग आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतेय.

‘तुमचे दिवस आता संपले’

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येकडे त्या दृष्टीने पाहिलं जात आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांच्या शब्दाला भरपूर किंमत आहे. हे तिघेही बाबा सिद्दीकीच्या कार्यक्रमात दिसायचे. आता गँगस्टर लॉरेंस बिश्नोईने बाबा सिद्दीकीची हत्या करुन या तिन्ही अभिनेत्यांना खासकरुन सलमान खानाला संदेश दिला आहे. त्याचबरोबर तुमचे दिवस आता संपले, हा डी कंपनीला सुद्धा संदेश दिला आहे. सलमानच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा डाव आहे.

आता फुलप्रूफ योजनेवर काम

लॉरेंस बिश्नोईची गुन्हेगारीची कारकीर्द 15 वर्षांपूर्वी सुरु झाली. मूळचा पंजाबचा असलेल्या लॉरेंसने संपत नेहरासोबत चंदीगडमध्ये गुन्हेगारीची सुरुवात केली. आधी हरियाणा, पंजाब आणि त्यानंतर दिल्लीत धाक निर्माण केला. त्यानंतर जगातील सात देशात नेटवर्क तयार केलं. सलमान खानला धमकी देण्यापासून त्यांनी सुरुवात केली. आता बॉलिवूडवर वर्चस्व मिळवण्याच्या फुलप्रूफ योजनेवर त्यांनी काम सुरु केलय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.