AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दोन स्टेशन दरम्यान चोरट्यांचा थांबा, तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल चोरले, पोलिस म्हणतात…

kalyan Crime News : कल्याण ते आंबिवली दरम्यान दरवाजामध्ये उभे राहून मोबाईलवर बोलत असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल गेले चोरीच्या घटना घडल्या आहेत.

या दोन स्टेशन दरम्यान चोरट्यांचा थांबा, तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल चोरले,  पोलिस म्हणतात...
मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार
| Updated on: May 20, 2023 | 8:14 AM
Share

सुनील जाधव, कल्याण : कल्याण लोहमार्ग पोलीस (Kalyan railway police) ठाण्याच्या हद्दीमधील कल्याण ते आंबिवली (Kalyan to Ambivali) हा पट्टा अधिक संवेदनशील झाला आहे. कारण मोबाईल चोरीला जाणे आणि सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यात साडे तीनशे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 40 टक्के तक्रारीचे निवारण करण्यात रेल्वे पोलीसांना यश आलं आहे. प्रवाशांनी दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करू नये, गर्दीत प्रवास करताना आपला मोबाईल (mobile) आणि बॅगची काळजी घ्यावी असं आवाहन कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केलं आहे.

सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश

अनेकदा मोबाईल चोरीला गेला, तरी प्रवासी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणे टाळतात.त्यामुळे मोबाईल चोरीचा आकडा प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता आहे. प्रवासी अनेकदा लोकलच्या दरवाजामध्ये उभे राहून मोबाईलवर बोलत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरत आहेत. कल्याण ते आंबिवली दरम्यान अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. इराणी गँगच्या सोबत असणारे इतर आरोपी अशा प्रकारची कृत्य करत मोबाईल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नुकतेच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करताना तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असून त्यांच्याकडून एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आलं आहे. प्रवाशांनी दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करू नये त्याचप्रमाणे गर्दीत प्रवास करताना आपला मोबाईल आणि बॅगची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईतल्या अनेक स्टेशनच्यामध्ये बाहेर उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलवरती फटका मारला जातो. मोबाईल खाली पडला की, चोरटे तो ताब्यात घेऊन पुढील गोष्टी करतात. कुर्ला आणि सायन स्टेशनच्यामध्ये सुध्दा अशा पद्धतीचा प्रकार अनेकदा घडला आहे.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.