AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दोन स्टेशन दरम्यान चोरट्यांचा थांबा, तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल चोरले, पोलिस म्हणतात…

kalyan Crime News : कल्याण ते आंबिवली दरम्यान दरवाजामध्ये उभे राहून मोबाईलवर बोलत असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल गेले चोरीच्या घटना घडल्या आहेत.

या दोन स्टेशन दरम्यान चोरट्यांचा थांबा, तीन महिन्यात साडेतीनशे मोबाईल चोरले,  पोलिस म्हणतात...
मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार
| Updated on: May 20, 2023 | 8:14 AM
Share

सुनील जाधव, कल्याण : कल्याण लोहमार्ग पोलीस (Kalyan railway police) ठाण्याच्या हद्दीमधील कल्याण ते आंबिवली (Kalyan to Ambivali) हा पट्टा अधिक संवेदनशील झाला आहे. कारण मोबाईल चोरीला जाणे आणि सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यात साडे तीनशे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 40 टक्के तक्रारीचे निवारण करण्यात रेल्वे पोलीसांना यश आलं आहे. प्रवाशांनी दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करू नये, गर्दीत प्रवास करताना आपला मोबाईल (mobile) आणि बॅगची काळजी घ्यावी असं आवाहन कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केलं आहे.

सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश

अनेकदा मोबाईल चोरीला गेला, तरी प्रवासी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणे टाळतात.त्यामुळे मोबाईल चोरीचा आकडा प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता आहे. प्रवासी अनेकदा लोकलच्या दरवाजामध्ये उभे राहून मोबाईलवर बोलत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरत आहेत. कल्याण ते आंबिवली दरम्यान अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. इराणी गँगच्या सोबत असणारे इतर आरोपी अशा प्रकारची कृत्य करत मोबाईल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नुकतेच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करताना तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असून त्यांच्याकडून एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आलं आहे. प्रवाशांनी दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करू नये त्याचप्रमाणे गर्दीत प्रवास करताना आपला मोबाईल आणि बॅगची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईतल्या अनेक स्टेशनच्यामध्ये बाहेर उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलवरती फटका मारला जातो. मोबाईल खाली पडला की, चोरटे तो ताब्यात घेऊन पुढील गोष्टी करतात. कुर्ला आणि सायन स्टेशनच्यामध्ये सुध्दा अशा पद्धतीचा प्रकार अनेकदा घडला आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.