AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी मुलीने असा खेळ केला, आधी दुधाने भरलेला ग्लास दिला, मग…

लग्न म्हणजे दोन कुटुंबाच मिलन. लग्न करताना डोळ्यात हजारो स्वप्न साठवलेली असतात. पण एका विवाहात लग्नाच्या पहिल्या रात्रीच नव्या नवरीने असं काही केलं की, नवरदेवासह सगळेच हैराण झालेत.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी मुलीने असा खेळ केला, आधी दुधाने भरलेला ग्लास दिला, मग...
Married Girl
| Updated on: Dec 16, 2024 | 4:46 PM
Share

मोठ्या अपेक्षांनी, डोळ्यात अनेक स्वप्न साठवून नवरदेव नवरी मुलीला लग्न करुन घरी घेऊन आला. गृह प्रवेशाचा विधी झाल्यानंतर दोघे रात्री झोपण्यासाठी निघून गेले. लग्नाची पहिली रात्र असल्याने नवरीने नवरदेवाला दूधाने भरलेला ग्लास दिला. हे दूध पिल्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी डोळे उघडले, तेव्हा नवरी मुलगी रुममध्ये नव्हती. नशा असलेलं दूध प्याल्यामुळे नवरदेवाची तब्येत बिघडली. नातेवाईकांना त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. दूध पिल्यानंतर नवरदेवाची शुद्धच हरपली. मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील हे प्रकरण आहे.

नौगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील कुलवारा गावातील हे प्रकरण आहे. लग्नानंतर 24 तासांच्या आत नवरी मुलगी फरार झाली. तिने पतीच्या दूधात नशेचा पदार्थ मिसळलेला. लाखो रुपयाचे दागिने घेऊन ती पसार झाली. या घटनेनंतर नवरदेवाची तब्येत बिघडली आहे. त्याला धक्का बसलाय. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

हिंदू रितीरिवाजाने लग्न

पीडित युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लुटारु नवरी, तिचा भाऊ आणि मित्रासह चौघांविरोधात गुन्हा नोंदवलाय. चारही आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी सांगितलं की, अशोक रावत यांचा 29 वर्षीय मुलगा राजदीप रावतच लग्न चरखारी येथे रहाणाऱ्या खुशी तिवारीसोबत 11 डिसेंबरला हिंदू रितीरिवाजाने झालं.

दुधाने भरलेला ग्लास दिला

लग्नामध्ये मुलीचा भाऊ छोटू तिवारी, त्याचा मित्र विनय तिवारीसह अन्य लोक सहभागी झाले. 12 डिसेंबरला लग्नाची पहिली रात्र हनिमून होता. नवरीने नवरा राजदीप रावतला दुधाने भरलेला ग्लास दिला. दूध पिताच राजदीपला गुंगी आली, तो झोपून गेला, त्यानंतर नवरी मुलगी लग्नाचे सगळे दागिने व नणदेचे दागिने घेऊन पसार झाली. युवकाला शुद्ध आली, तेव्हा समजलं की पत्नी गायब आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर समजलं की, तिने दुधात गुंगीच औषध मिसळलं होतं.

कोणी जुळवलेलं लग्न?

पीडित युवकाच्या वडिलांनी सांगितलं की, नौगांवा गावातील शकुन पाठक यांनी हे लग्न जुळवलं होतं. लग्नाच्या 17 दिवस आधी पप्पू राजपूत आणि शकुन पाठक यांनी चरखारीच्या हनुमान मंदिरात मुलगी दाखवली होती. खुशी तिवारीसोबत तिचा भाऊ छोटू तिवारी आणि मित्र विनय तिवारी सोबत आले होते.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?