AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावात पोलिसांचा तक्रारदारांनाच अजब सल्ला, चोरट्यांना पोलिसांचेच अभय? पालकमंत्र्याच्या गावात चाललंय काय?

नागरिकांची तक्रार बाजूला राहिली पोलिसांनी अजब सल्ला दिल्याने मालेगाव तालुका पोलिसांच्या विरोधात नागरिक एकवटले आहे. थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

मालेगावात पोलिसांचा तक्रारदारांनाच अजब सल्ला, चोरट्यांना पोलिसांचेच अभय? पालकमंत्र्याच्या गावात चाललंय काय?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 04, 2023 | 9:52 AM
Share

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिस ( Maharashtra Police ) दलाचे ब्रीदवाक्य आहे. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. मात्र, मालेगाव तालुक्यातील नागरिकांना काहीसा अजब अनुभव येत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ( Malegaon Crime ) वाढली आहे. अशातच दोघा तरूणांवर काही गुंडांनी हल्ला केला होता. गावकऱ्यांनी नंतर त्या गुंडांना पकडले देखील. मात्र पोलिसांनी त्यांना अजब सल्ला दिल्याने तालुका पोलिस ठाण्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढलं आहे. ग्रामीण भागात चोरी करण्याबरोबरच हल्ला करण्याचा नवा पॅटर्न समोर आला आहे. याबाबतचे सीसीटीव्ही सुद्धा समोर आले असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी हॉट आहे.

विशेष म्हणजे गावातील तरुण पोलिसांच्या हाती हल्लेखोरांना पकडून देत आहे. तरी देखील पोलिस कारवाई करत असून अजब सल्ला देत आहे. शिवीगाळ करत तुमच्यात दम नाही का ? असा सवाल करत आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

तालुका पोलिस ठाण्याच्या विरोधात नागरिक एकवटले आहे. कारवाई करण्याचे सोडून नागरिकांना अजब सल्ला दिला जात आहे. त्यावरून नागरिकांनी तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांवर गंभीर आरोप करत थेट अप्पर पोलिस आधीक्षकांकडे धाव घेतली आहे.

अप्पर पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली असून चिखलओहोळ परिसरातील हल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यानिमित्ताने पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहे.

तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, हल्ले अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतात का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.