AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदार यादीतून माझे नाव काढून टाकले; प्रकाश राज यांचा दावा, Video Viral

प्रकाश राज यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून मतदान करण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रियेनंतर बंगळुरु मतदारसंघाच्या मतदार यादीतून त्यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे.

मतदार यादीतून माझे नाव काढून टाकले; प्रकाश राज यांचा दावा, Video Viral
प्रकाश राजImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 2:48 PM
Share

प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मोठा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की बंगळुरु मतदारसंघातील त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रियेनंतर हे घडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रकाश यांचा जन्म बंगळुरूमध्ये झाला. तेथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि थिएटर केले. तरीही त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला असल्याचे प्रकाश राज यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. या व्हिडीओमध्ये त्यांनी “चांगला जोक आहे. असाच सुरू ठेवा” हे उपरोधीकपणे म्हटले आहे.

काय आहे प्रकाश राज यांचा व्हिडीओ?

अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते बोलताना दिसत आहेत की, मला तुम्हाला एक जोक सांगायचा आहे. मी त्या 65 लाख मतदारांपैकी आहे ज्याचा बंगळुरु मतदार संघातील मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. तेही एसआयर प्रक्रियेनंतर. मस्त जोक आहे ना. माझा जन्म बंगळूरुमध्ये झाला आहे. मी याच मंतदार संघात राहात आहे. माझी शाळा, कॉलेज आणि थिएटरदेखील इथूनच झाले. हा खरच खूप चांगला जोक आहे. खेळ सुरु आहे.

पुढे ते म्हणाले, आता पाहूया, आपला वोटर आयडी परत मिळवण्यासाठी काय काय कागदपत्रे दाखवावे लागतील. खेळ सुरू आहे. ते लोक आपली सत्ता दाखवण्यासाठी हे सर्व करू शकतात. त्यांचा मतदान करण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकतात. पण हे लोक त्यांना त्यांच्या सत्तेतून काढून टाकण्यापासून रोखू शकतील का?

व्हिडीओ शेअर करत उपरोधीक टोला

प्रकाश राज यांनी हा व्हिडीओ शेअर करत, जरी तुम्ही काही नागरिकांचा मतदान करण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकता, जे कदाचित तुम्हाला पुन्हा सत्तेवर निवडणार नाहीत. पण ज्या सत्तेवर तुम्ही बसला आहात, तिथून तुम्हाला खाली उतरवण्याच्या आमच्या प्रयत्नाला तुम्ही रोखू शकाल का? या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

प्रकाश राज यांच्या कामाविषयी

प्रकाश राज यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते ‘दृश्यम ३’ या चित्रपटात दिसणार आहेत. प्रकाश राज चित्रपटांशिवाय आपल्या बिनधास्त विधानांमुळेही चर्चेत राहतात. ते प्रत्येक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले मत मांडतात दिसतात. अलीकडे दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनातही प्रकाश राज सहभागी झाले होते. जंतर मंतर येथील त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?