AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Suicide : उत्पन्नच नाही, कसं फेडू कर्ज? शेतकऱ्याची स्वतःच्या विहिरीतच गळफास घेत आत्महत्या

Bhandara Farmer Suicide : तीन एकर जागेत उन्हाळी धानाची रोवणी करून त्यावर जवळपास साठ हजार रुपयाच्या वर पैसे खर्च केले.

Farmer Suicide : उत्पन्नच नाही, कसं फेडू कर्ज? शेतकऱ्याची स्वतःच्या विहिरीतच गळफास घेत आत्महत्या
शेतकऱ्याची आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 27, 2022 | 7:59 AM
Share

भंडारा : शेतकऱ्यानं आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची एक हृदय हेलवणारी घटना भंडाऱ्यातून (Bhandara Suicide) समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एका शेतकऱ्यानं आपल्याच विहिरीत गळफास लावून घेतला आणि जीवनयात्रा संपवली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. उन्हाळी धानाचे काही उत्पन्न शेतकऱ्यांच्या वाट्याला आलं नव्हतं. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला होता. अत्यल्प उत्पादनामुळे कर्जदारांचे (Farmer Loan) कर्ज कसं फेडायची, याची चिंता या शेतकऱ्याला सतावत होती. आर्थिक संकटात सापडलेल्या त्रस्त शेतकऱ्याने अखेर स्वतःच्या शेतावरील विहिरीत गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील टेंभरी इथं घडली.देवराम तुळशीराम शिंगाडे असं शेतकऱ्यांचं नाव असून वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आत्महत्या करत जीव दिलाय.

शेतकऱ्याच्या आत्महत्येनं हळहळ

मृतक देवराम शिंगाडे हे अनेक वर्षापासून शेतीसह पशू व्यवसाय सुद्धा करायचे. या वर्षी तीन एकर जागेत उन्हाळी धानाची रोवणी करून त्यावर जवळपास साठ हजार रुपयाच्या वर पैसे खर्च केले. यासाठी सहकारी संस्थेच्या जवळपास पंचावन्न हजार रूपयांचा कर्ज ही घेतले. मात्र दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ पंधरा पोती धान उत्पादन झाले.

मनासारखं उत्पन्न न निघाल्यानं देवराम यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. गेल्या चारपाच दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. दरम्यान गावाशेजारी असलेल्या शेतावरील विहिरीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

आत्महत्या कधी थांबणार?

देवराम यांनी आत्महत्या केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असता परिसरातील नागरिकांनी एकाच गर्दी केली होती. दरम्यान लाखांदूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखायच्या अशा प्रश्न यानिमित्तानं पुन्हा उपस्थित झालाय.

Follow Us
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?