AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत चंद्रावर, पण लोकं काही सुधरेना, अंधश्रद्धेपोटी सॉफ्टवेअर इंजीनिअरने लेकीचाच घेतला बळी; काय घडलं नेमकं ?

अंधश्रद्धेमुळे एक सॉफ्टवेअर इंडिनिअरने त्याच्या निरागस मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामागचे कारण ऐकून सर्वच हादरले.

भारत चंद्रावर, पण लोकं काही सुधरेना, अंधश्रद्धेपोटी सॉफ्टवेअर इंजीनिअरने लेकीचाच घेतला बळी; काय घडलं नेमकं ?
| Updated on: Aug 25, 2023 | 3:22 PM
Share

हैदराबाद | 25 ऑगस्ट 2023 : भारताचं यान चंद्रावर जाऊन पोहोचलंय, रोज नवनवी टेक्नॉलॉजी समोर येत आहे. मात्र असं असतानाचं काही लोकं अजूनही अंधश्रद्धांचे पालन करताना दिसत आहे. अमावस्येला होणाऱ्या गुप्त पूजा अन विधी अजूनही सुरू आहेत. याच अंधश्रद्धेमुळे एका निरागस मुलीला तिचा (small girl ) जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना (crime news) उघडकीस आली आहे.

मुलीची कुंडली खराब असल्याच्या कारणावरून वडिलांनी तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भविष्यात मुलीला त्रास होईल या भीतीने त्याने तिचा वर्तमानच खराब केला आणि आयुष्य संपवलं. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या या पित्याने आपल्या आठ वर्षांच्या मुलीचा पेन्सिल कटरच्या ब्लेडने गळा चिरून खून केला.

हैदराबादच्या विजयवाडा येथील रहिवासी चंद्रशेखर आणि हिमा बिंदू यांना आठ वर्षांची मुलगी होती. दोघेही आयटी कंपनीत काम करतात. पती-पत्नीमध्ये पूर्वीपासूनच भांडण सुरू होते. दरम्यान, खराब कामगिरीमुळे कंपनीने चंद्रशेखरला नोकरीवरून काढून टाकले. यासाठी त्याने पत्नीला जबाबदार धरले. दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाले. त्यामुळे ती बिंदू ही मुलीसह माहेरी गेली होती.

नोकरी गमावली, पत्नीला मानले जबाबदार

त्यानंतर चंद्रशेखर हा आपल्या मुलीला भेटायला जात असे. ती एका शाळेत शिकत होती. मात्र आपल्या मुलीची कुंडली खराब असल्याने तिला भविष्यात अडचणीचा सामना करावा लागणार असल्याचे त्याला समजले. त्यानंतर घटनेच्या दिवशी (18 ऑगस्ट) तो मुलीला घेण्यासाठी शाळेत गेला आणि तिला गाडीत बसवून निघाला. काही अंतरावर जाऊन त्याने मुलीची हत्या केली. असं करून तो पत्नीलाही धडा शिकवणार होता. त्याला तिचा मानसिक छळ करायचा होता. संध्याकाळ होऊनही मुलगी घरी न आल्याने तिची आई, बिंदू हिने तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तिने नवरा, चंद्रशेखर यालाही फोन केला, तेव्हा त्याने मुलगी आपल्याबोतच राहणार असल्याचे सांगितले. सध्या ती झोपली आहे, असंही तो म्हणाला.

कार अपघातानंतर झाला खुलासा

त्यानंतर चंद्रशेखर याने मुलीचा मृतदेह लपवण्यासाठी जागेचा शोध सुरू केला. कारमध्ये निष्पाप मुलीचा मृतदेह ठेवून तो रस्त्यावर फिरत होता. तेवढ्यात त्याचा अपघाता झाला. टायर फुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. रात्री १०.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. तेव्हा संशयास्पद अवस्थेती चंद्रशेखरला पाहून त्यांना संशय आला, त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते.

त्यांनी आत पाहिले असता कारमध्ये एका मुलीचा मृतदेह होता. त्यानंतर लोकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिस तातडीने तिथे पोहोचले व वडिलांचा क्रूरपणा उघड झाला. पोलिसांनी चंद्रशेखरला अटक केली असून गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला