AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atul Subhash Case : अतुल सुभाष-निकिता सिंघानियाच्या लव्ह स्टोरीमध्ये कोण होता तो तिसरा, त्याच्यामुळेच संसारात वादळ

Atul Subhash Case : बंगळुरुतील AI इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात त्याचे वडील पवन सुभाष यांनी अनेक हैराण करणारे खुलासे केले आहेत. ते TV9 भारतवर्षशी बोलले. लग्नानंतर दोघांमध्ये कधी आणि कुठल्या कारणांमुळे संबंध बिघडले त्याबद्दल सांगितलं.

Atul Subhash Case : अतुल सुभाष-निकिता सिंघानियाच्या लव्ह स्टोरीमध्ये कोण होता तो तिसरा, त्याच्यामुळेच संसारात वादळ
Atul Subhash-Nikita Singhania
| Updated on: Dec 13, 2024 | 3:43 PM
Share

AI इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येच प्रकरण सध्या चर्चेत आहे. पत्नीसह पाच जणांवर आत्महत्येसाठी चिथावणी दिल्याचा आरोप करत अतुलने सोमावारी जीवन संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी अतुलच्या पत्नीसह चार जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सध्या सगळे आरोपी फरार आहेत. या दरम्यान TV9 भारतवर्षने अतुलचे वडील पवन सुभाष यांच्याबरोबर चर्चा केली. अतुल सोबत काय-काय झालं? त्याला किती त्रास झाला? सूनेवर सुद्धा पवन यांनी गंभीर आरोप केले.

“लग्न केलं की, स्वत:च आयुष्य उद्धवस्त केलं, हे त्याला सुद्धा माहित नव्हतं. लग्नानंतर अतुल पत्नीच्या दबावाखाली होता. तिची प्रत्येक गोष्ट मान्य केली. तिची स्वप्न पूर्ण केली. पत्नीला ऑफिसला सोडण्यासाठी आणि तिला आणण्यासाठी रोज अतुल तिच्यासाठी 34 किलोमीटर प्रवास करायचा. प्रवासातच त्याचा दिवस जायचा” असं अतुलचे वडील पवन सुभाष यांनी सांगितलं.

‘तो दु:ख झेलत राहीला’

“27 एप्रिल 2019 रोजी लग्न केलं. तो आमच्यासोबत 29 एप्रिलपर्यंत राहीला. त्यानंतर तो इथे आला नाही. माझं वय 62 आणि पत्नी अंजूच वय 55 आहे. आमच्या वयाचा विचार करुन पत्नी निकिता त्याला किती त्रास देतेय, हे त्यानं कधीच सांगितलं नाही. तो दु:ख झेलत राहीला” असं पवन सुभाष यांनी सांगितलं.

‘आधी तुम्ही घेतलेले पैसे परत करा’

दोघांचे संबंध का बिघडले? त्यामागच खरं कारण पवन सुभाष यांनी सांगितलं. “दोघांचे संबंध आधी खराब नव्हते. कोरोनाकाळ सुरु झाला, त्यावेळी सर्वात खराब स्थिती बंगळुरुमध्ये होती. माझा सुनेला कोरोना झाला, त्यावेळी अतुलकडून एकच चूक झाली. त्याने आईऐवजी सासूला बोलावलं. हीच चूक त्याला भारी पडली. त्यानंतर सगळा खेळ बिघडला. सासू आल्यानंतर तिने माझ्या मुलाकडे पैसे मागायला सुरुवात केली. 16 लाख आधीच त्यांनी माझ्या मुलाकडून घेतले होते. आणखी 50 लाखाची मागणी करत होते. तुम्ही पैसे द्या, मी व्याजासह परत करीन असं सांगत होती. त्यावेळी अतुल बोलला की, मी आधीच माझ्या आई-वडिलांना न सांगता तुम्हाला पैसे दिले आहेत. मी तुम्हाला आता आणखी कर्ज देऊ शकत नाही. आधी तुम्ही घेतलेले पैसे परत करा” असं पवन सुभाष म्हणाले.

राग म्हणून 9 खटले भरले

अतुलने इतक सांगताच ते लोक चिडले. त्यानंतर ते मुलीला घेऊन जौनपूरला निघून गेले. तिथे नेल्यानंतर त्यांनी अतुलच त्याच्या मुलासोबत बोलणं बंद केलं. अतुलने जे त्यांना पैसे दिलेले, ते त्यांनी परत केले. त्यांना याचा इतका राग आला की, त्यांनी अतुलवर 9 खटले दाखल केले.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.