AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बकऱ्यांच्या साक्षीमुळे आरोपीवर बलात्कार आणि खूनाचा गुन्हा सिद्ध, नराधमाला आजीवन कारावास

एका सात मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. आरोपीचा शोध लागत नव्हता, अखेर बकऱ्यांमुळे आरोपी सापडला.

बकऱ्यांच्या साक्षीमुळे आरोपीवर बलात्कार आणि खूनाचा गुन्हा सिद्ध, नराधमाला आजीवन कारावास
अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 18, 2023 | 2:53 PM
Share

हरियाणा | 18 ऑगस्ट 2023 : हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील एका गावात एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपीवरील गुन्हा सिद्ध होण्यात बकऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. या प्रकरणातील आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. चार वर्षे जुन्या प्रकरणात आरोपीवर नूंह कोर्टाने वेगवेगळ्या कलमांखाली आरोपपत्र दाखल करीत 75 हजार रुपयांचा दंड देखील सुनावला आहे.

हरियानाच्या नूंह जिल्ह्यात 26 डिसेंबर 2019 रोजी एका व्यक्तीने सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करीत तिची हत्या केली होती. या अल्पवयीन बालिकेच्या पित्याने 27 डिसेंबर रोजी फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला.

झुडुपात मृतदेह सापडला

या प्रकरणातील सरकारी वकील आकाश तंवर यांनी सांगितले की मुलीच्या पित्याने तक्रारीत म्हटले होते की त्यांची सात वर्षीय मुलगी रोजच्या सारखी 26 डिसेंबर 2019 रोजी गावानजिकच्या डोंगरात बकऱ्यांना चरायला घेऊन गेली होती. ती घरी न परतल्याने दुसऱ्या दिवशी गावातील अन्य रहीवाशांच्या मदतीने शोधाशोध केली तर झुडपांमध्ये तिचा मृतदेह आढळला.

अखेर आरोपीची ओळख पटली

घटनेचा तपास करताना पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातीस सर्व सीसीटीव्ही तपासले. ज्यात एक युवक बकऱ्यांना घेऊन जाताना दिसत आहे. पीडीताच्या वडीलांना हे सीसीटीव्ही फुटेज दाखविले तेव्हा त्यांनी त्यांच्या बकऱ्यांना ओळखले. त्यानंतरच आरोपीची ओळख पटली. या प्रकरणी मुकीम उर्फ मुक्की याला अटक करण्यात येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करीत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.