AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटात पिकअपचा भीषण अपघात, नागमोडी वळणावर गाडी पलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू

पिकअप वाहनात असलेल्या 6 जणांपैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून तीन जणांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

घाटात पिकअपचा भीषण अपघात, नागमोडी वळणावर गाडी पलटली,  3 जणांचा जागीच मृत्यू
Pick up accidentImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 23, 2023 | 1:24 PM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Pickup Accident) जिल्ह्यातील धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या चांदशैली घाटात पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाटात रस्ता खराब असल्याने आणि नागमोडी वळणाचा तीव्र उताराचा असलेल्या, पिकअप गाडीत प्रवासी करणाऱ्या तीन प्रवाशांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती मिळाली आहे. हा चांदसैली घाट (Chandsaili Ghat) असून नागमोडी वळणावरून तीन पलटी खाल्ल्याने गाडी दरीत कोसळली आहे. पोलिसांनी (Nandurbar police) दिलेल्या माहितीनुसार, एकाची प्रकृती नाजूक आहे. ज्यावेळी हा अपघात झाला. त्यावेळी, मोठा आवाज झाल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

या कारणामुळे अपघात झाला

पिकअप वाहनात असलेल्या 6 जणांपैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून तीन जणांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहेत. धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोळणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा चांदसैली घाट असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता हा खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचं म्हटलं जात आहेत. खचलेल्या रस्त्यांमुळे अजून किती प्रवाशांचा जीव प्रशासन घेणार आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत.

रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात

महाराष्ट्रात अपघाताच्या रोज नव्या गोष्टी घडत असतात. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील होत असतो. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात होत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. ग्रामीण भागात अरुंद रस्ते, त्याचबरोबर खचलेले रस्ते यामुळे अपघात होतात. त्यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. तर काहीजणांचा जीव गेला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान