AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरी लग्न सोहळ्याचे आयोजन, कुटुंबीय नाचत होते, अचानक घरी रक्तरंजित खेळ सुरु झाला, काय घडले नेमके?

घरी लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक नाचत होते. मात्र अचानक असे काही घडले की, लग्नघरात शोककळा पसरली. या घटनेमुळे सर्वच हादरले.

घरी लग्न सोहळ्याचे आयोजन, कुटुंबीय नाचत होते, अचानक घरी रक्तरंजित खेळ सुरु झाला, काय घडले नेमके?
पत्नीसोबत नाचणाऱ्या भावांना भावाने संपवलेImage Credit source: Google
| Updated on: May 16, 2023 | 6:28 PM
Share

कबीरधाम : छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरी लग्न सोहळा होता. यामुळे सर्वजण नाचत होते. यावेळी पत्नी आपल्या दोन दिरांसह नाचली म्हणून पतीने आपल्या दोघा भावांची हत्या केल्याची घटना छत्तीसगडमधील कबीरधाम येथे घडली. एवढ्यावरच तो थांबला नाही. भावांची हत्या केल्यानंतर त्याने पत्नी, भावोजी आणि मोठ्या भावालाही जबर जखमी केले. सध्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन हद्दीतील तारेगाव जंगलातील बंगौरा गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तिन्हा बेगा याच्याविरुद्ध कलम 302, 307 अन्वये गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे.

पत्नीला भावांसोबत नाचताना पाहून पती संतापला

घरी लग्न समारंभ होता. यामुळे घरातील सर्वजण आनंदात गात आणि नाचत होते. यावेळी आरोपी तिनहा बेगाची पत्नी सनमतीबाईही सर्वांसोबत नाचत होती. सनमतीबाई आपल्या दिरांसोबत नाचत होती. पती तिनहा बेगाला ही गोष्ट आवडली नाही आणि हे पाहून तो संतापला. यानंतर संतापलेल्या पतीने सर्वांसमोर पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीवर चाकूने वार करून तिला जखमी केले. कसा तरी जीव वाचवून सनमतीबाई तिथून पळाली.

भावांची हत्या करत पत्नीसह तिघांना जखमी केले

यानंतर तिनहा बेगा याने पत्नीसोबत नाचत असलेले दोघे भाऊ जगत बेगा आणि टिकू यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मोठा भाऊ मोहटू बेगा आणि मेहुणा सुखराम बेगा मदतीसाठी आले असता आरोपीने त्यांनाही काठीने मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली. नातेवाईकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तिनहा बेगाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.