AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज गेली म्हणून छतावर झोपले होते दाम्पत्य, सकाळी दोघांचे मृतदेहच आढळले, कारण काय?

एकीकडे अवकाळी आणि एकीकडे उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. पावसामुळे परिसरातील वीज खंडित करण्यात आली होती. पण उकडाही भयंकर जाणवत होता. यामुळे दाम्पत्य छतावर झोपले होते.

वीज गेली म्हणून छतावर झोपले होते दाम्पत्य, सकाळी दोघांचे मृतदेहच आढळले, कारण काय?
Image Credit source: Google
| Updated on: May 16, 2023 | 5:28 PM
Share

सार : सध्या गरमीचे दिवस आहेत. माणसं उकाड्याने हैराण आहेत. मात्र या उकाड्याच्या दिवसात ग्रामीण भागात वीज कपात सुरु आहे. अशीच एक घटना हरयाणात उघडकीस आली आहे. घरातील वीज गेली होती. उकाड्याने हैराण झाल्यामुळे पती-पत्नी घराच्या छतावर झोपले होते. मात्र उकाड्यापासून वाचण्यासाठी गेले आणि निसर्गाने प्राणच हिरावून नेले. दाम्पत्य रात्री छतावर झोपले असताना वादळ आले आणि वादळामुळे निर्माणाधीन भिंत कोसळली. यात दाम्पत्य जखमी झाले. भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले. कुटुंबीयांनी दाम्पत्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वीज गेल्याने छतावर झोपले होते दाम्पत्य

सध्या देशभरात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. पावसामुळे संध्याकाळपासून परिसरातील वीज गेली होती. यामुळे नांगल चौधरी परिसरातील वॉर्ड नंबर 13 रहिवासी विजय आणि त्यांची पत्नी प्रेम देवी हे छतावर झोपले होते. मात्र रात्रीच्या सुमारास पुन्हा वादळ आले. यावेळी विजय यांच्या शेजारच्या घराची निर्माणाधीन भिंत पती-पत्नीच्या अंगावर कोसळली.

दाम्पत्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

भिंत कोसळल्याचा आवाज आणि दाम्पत्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरचे छतावर धावत गेले. छतावर पाहतात तर पती-पत्नी भिंतीखाली कोसळलेल्या भिंतीखाली दबले होते. घरच्यांनी तात्काळ दोघांना सरकारी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत जोडप्याला दोन मुलं आहेत. मयत विजय ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मुलं खाली घरामध्ये झोपल्यामुळे बचावली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.