AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावयासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, मग संतापलेल्या सासऱ्याने पत्नीला थेट…

आधी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. मग सासूसोबत प्रेमसंबंध जुळले. सासऱ्याने नको ते करताना पाहिले अन् विपरीत पाहिले.

जावयासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, मग संतापलेल्या सासऱ्याने पत्नीला थेट...
अनैतिक संबंधातून पतीने पत्नीला संपवले
| Updated on: May 13, 2023 | 12:12 AM
Share

बिलासपूर : छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जावयासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने जावयावरही हल्ला केला, पण यातून तो थोडक्यात बचावला असला तरी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर आरोपी सासरा पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चंदन मेश्राम असे अटक आरोपीचे नाव आहे.

चंदन मेश्राम याला तीन मुली आणि दोन मुलगे अशी पाच अपत्ये आहेत. शेती व्यवसाय करुन तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मोठ्या मुलीचा जुनापारा येथील संजू याच्यासोबत झाला होता. मुलीच्या लग्नानंतर सासू अमरिकीबाई आणि जावई संजू यांच्यात प्रेमसंबंध जुळले.

पत्नीला जावयासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून पती संतापला

दरम्यान, बुधवारी दुपारी चंदन अचानक त्यांच्या शेतात पोहोचला. तेथे त्याची पत्नी जावई संजूसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आहे. हे पाहून त्याचा संयम सुटला आणि जवळच ठेवलेली कुऱ्हाड उचलून दोघांवर हल्ला केला. या घटनेत त्याची पत्नी जागीच ठार झाली, तर संजू गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी तेथे गोळा झाले. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालात पाठवला. तर जखमी संजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सासू आणि जावई गुपचूप भेटायचे

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला आधीपासूनच जावई संजू आवडत नव्हता. त्याला आपली मुलगी ललिता हिचे लग्न त्याच्याशी करायचे नव्हते. मात्र संजूने आधी त्याच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर त्याने संजू आणि मुलीचे नाते तोडले. असे असतानाही संजू गुपचूप त्याच्या घरी येऊन पत्नीला भेटत होता.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.