AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाल्याच्या टेम्पोमधून सुरू होती गोमांस तस्करी, पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश

कल्याण कोळशेवाडी पोलिसांना नाशिकवरून जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस तस्करी होणार असल्याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती.

भाजीपाल्याच्या टेम्पोमधून सुरू होती गोमांस तस्करी, पोलिसांनी 'असा' केला पर्दाफाश
कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलिसांकडून गोमांस जप्तImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Oct 22, 2022 | 6:46 PM
Share

कल्याण : भाजीपाल्याच्या पिकअप टेम्पोमध्ये नाशिकवरून मुंबईला विक्रीसाठी जाणारे सुमारे दोन हजार किलो गोमांस (Beef) कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police) जप्त केले. याप्रकरणी पिकअपच्या चालकाला अटक केली आहे. इम्तिहाज फैयाज सय्यद असे या आरोपीचे नाव असून झटपट पैसे कमवण्यासाठी आरोपी ही तस्करी (Smuggling) करत होता.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला

कल्याण कोळशेवाडी पोलिसांना नाशिकवरून जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस तस्करी होणार असल्याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याचे एपीआय उल्हास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोळशेवाडी पोलिसांनी कल्याण काटे मानिवली नाक्यावर सापळा लावला.

संशयित टेम्पो तपासणी केली असता गोमांस आढळले

काटेमानवली नाक्यावर दबा धरुन बसलेल्या पोलिसांना एक संशयित टेम्पो नाशिककडून मुंबईच्या दिशेने येत असल्याचे दिसले. पोलिसांनी हा टेम्पो थांबवला आणि त्या टेम्पोची कसून तपासणी केली.

तपासणीत त्या टेम्पोत दीड ते दोन हजार किलो गोमांस असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी टेम्पोसह हे गोमांस ताब्यात घेतले. तसेच टेम्पो चालकालाही ताब्यात घेतले.

आरोपीची कसून चौकशी सुरु

पोलिसांनी गोमांस तस्करी करणाऱ्या टेम्पो चालकाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या आरोपीकडून दोन हजार किलो गोमांस जप्त केले आहे.

आरोपी हे गोमांस नाशिकमधून कुणाकडून हस्तगत करत होता आणि मुंबईत कोणाकडे डिलिव्हर करणार होता, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. कोळशेवाडी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. चौकशीअंतीच या बाबी उघड होतील.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.