पती-पत्नीचा जीव गेला, संशयाने पती-पत्नीचा संसार संपला !

भुजंग कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून, कमानिमित्त नाशिक येथे राहत होते. भुजंग तायडे हा पिठाच्या गिरणीत काम करत होता. भुजंगला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते.

पती-पत्नीचा जीव गेला, संशयाने पती-पत्नीचा संसार संपला !
नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 11:27 AM

नाशिक / चैतन्य गायकवाड : चारित्र्यावरील संशयातून पतीने पत्नीची हत्या करत स्वतःही जीवन संपवल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नाशिकमधील अंबड परिसरात घडली आहे. भुजंग अश्रू तायडे आणि मनिषा भुजंग तायडे अशी हत्या आणि आत्महत्या झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत तपास सुरु केला. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून, या प्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत.

आधी पत्नीला संपवले मग स्वतः आत्महत्या केली

नाशिकच्या अंबड चुंचाळे परिसरात तायडे पती-पत्नी कुटुंबासोबत राहत होते. पती भुजंग तायडे याला आपली पत्नी मनिषाचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने बुधवारी सायंकाळी धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर भुजंगने स्वतःही किचनमधील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

मुले क्लासवरुन घरी आल्यानंतर घटना उघडकीस

सायंकाळी साडेसातच्या दरम्यान मुले क्लासवरुन आल्यानंतर दरवाजा उघडण्यासाठी त्यांनी दार ठोठावले, आईला आवजही दिला. मात्र बराच वेळ दार न उघडल्याने त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून आत पाहिले असता आत दोघेही पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून सुरु होते वाद

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. भुजंग कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून, कमानिमित्त नाशिक येथे राहत होते. भुजंग तायडे हा पिठाच्या गिरणीत काम करत होता. भुजंगला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.